शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

राज्यात वन्यक्षेत्रातील इथ्यंभूत माहितीसाठी आता ‘जीआयएस’ प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:45 IST

वनाच्छादनामुळे होणारा बदल, अवैध वृक्षतोड, वनीकरण, वणव्यांचे नियंत्रण, वन्यजीवांचे ठिकाण निश्चित करणे, मानव-वन्यजीव संघर्ष यासारखी खडान्खडा माहिती गोळा करण्यासाठी वन विभागातर्फे राज्यात जिआॅग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर (जीआयएस) उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांची माहितीवन विभागाची तंत्रज्ञानात झेप

आॅनलाईन लोकमतनागपूर : वनाच्छादनामुळे होणारा बदल, अवैध वृक्षतोड, वनीकरण, वणव्यांचे नियंत्रण, वन्यजीवांचे ठिकाण निश्चित करणे, मानव-वन्यजीव संघर्ष यासारखी खडान्खडा माहिती गोळा करण्यासाठी वन विभागातर्फे राज्यात जिआॅग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर (जीआयएस) उभारण्यात येणार आहे. ‘जीआयएस’ द्वारे राज्यातील वनसंपत्ती, वन्यजीवांवर नजर ठेवण्यात येईल, अशी माहिती तंत्रज्ञान विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील वनसंपत्ती, वन्यजीवांवर जीआयएसची नजर राहणार आहे. डिसेंबर महिन्यापासून ‘जीआयएस’ला प्रारंभ होईल.‘जीआयएस’चे नागपूर आणि पुणे येथे दोन केंद्र तर तिसरे केंद्र वन विभागाच्या मुख्यालयात नागपुरात राहील. भारतातील प्रत्येक राज्याने स्वतंत्र जीआयएस कक्ष स्थापन करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर वन विभागाने संबंधित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. वन विभागाने आपले स्वतंत्र जीआयएस सेंटर स्थापन केले आहे. यापूर्वी फॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाकडून विविध माहिती मागविण्याची पद्धत होती. आता, वन विभाग स्वत:च्या स्तरावर जंगलांची संपूर्ण माहिती गोळा करू शकणार आहे. जंगलातील प्रत्येक कम्पार्टमेंटची माहिती या सेंटरमुळे उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी राज्यात किती वनाच्छादन होते आणि यावर्षी ते किती आहे, याचा अंदाज यामुळे येईल. नेमके कोणत्या भागात जंगल कमी किंवा जास्त झाले आहे, हे सुद्धा या यंत्रणेमुळे कळणार असून, त्या आधारे परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिक कर्मचाºयांना आदेश देण्यात येतील. वणवा, मानव-वन्यप्राणी संघर्ष अशा बाबतीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी या माहितीचा फायदा होणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांनी सांगितले. जीआयएस पद्धतीने मिळालेली माहिती वेब पोर्टलवर उपलब्ध राहणार असून, ती सर्व वनाधिकाºयांना पाहता येईल. या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यात औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर वनवृत्तातील वनाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.हे कर्मचारी प्रशिक्षित झाल्यानंतर प्रत्येक वनवृत्तात अशी प्रशिक्षणे घेण्यात येतील. देशातील प्रत्येक राज्यात वनांचा विकास किती झाला, यावर केंद्र सरकारच्या वन मंत्रालयाचे लक्ष असते. नव्या ‘जीआयएस’च्या मदतीने मिळालेली माहिती केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान