शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

नागपूर : म्युकरमायकोसिसमुळे चिंतेचे वातावरण असताना आता कानांना बुरशीजन्य आणि बॅक्टेरिया संसर्गाच्या तक्रारी वाढल्या आहेत. कानाचा संसर्ग टाळण्यासाठी, आपले ...

नागपूर : म्युकरमायकोसिसमुळे चिंतेचे वातावरण असताना आता कानांना बुरशीजन्य आणि बॅक्टेरिया संसर्गाच्या तक्रारी वाढल्या आहेत. कानाचा संसर्ग टाळण्यासाठी, आपले कान स्वच्छ व कोरडे ठेवा. कानाचे दुखणे, ऐकायला कमी येणे, कानातून पाणी येणे यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला कान, नाक व घसा तज्ज्ञांनी दिला आहे.

पावसाळ्यात कानाचा संसर्ग होणे ही सामान्य घटना आहे. हा संसर्ग कानाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. कानाच्या आत आणि बाहेर सुद्धा जंतूसंसर्ग होऊ शकतो. अंघोळ करताना किंवा पावसाचे पाणी कानात साचून राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे वातावरणात वाढलेली आर्द्रताही बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. शिवाय कानातील मळ आणि इअरबड्सच्या वापरामुळे झालेली किरकोळ जखम देखील कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-ही आहेत लक्षणे

सतत अस्वस्थ वाटणे, कानात काही घालण्याची इच्छा होणे, चिडचिड होणे, खाज सुटणे, कानदुखी, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानातून पाणी येणे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि अगदी ताप यासारखे लक्षणे दिसू शकतात.

-म्युकरमायकोसिसच्या भीतीमुळे रुग्णांत वाढ

‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे, काळी बुरशीच्या भीतीमुळे कानाची समस्या उद्भवताच रुग्ण उपचारासाठी येत आहेत. परिणामी, रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कानाच्या संसर्गाचा उपचार म्हणजे कान स्वच्छ करणे, त्यासाठी डॉक्टरांची भेट घेऊन आवश्यक ते उपचार घेणे गरजेचे आहे.

-अशी घ्या काळजी

कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवा. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करा. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करा. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नका. कान दुखू लागल्यास किंवा कानातून पाणी येत असल्यास डॉक्टरांना भेटा.

-सामान्य आजार असला तरी दुर्लक्ष नको ()

पावसाळ्यात कानात बुरशी आणि जंतूसंसर्गाचे रुग्ण दिसून येतात. कोरोनामुळे आरोग्याला घेऊन सतर्कता बाळगली जात असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. हा सामान्य आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या उपचारात ‘टॅबलेट’ कामी पडत नाही. कानात टाकणारी औषधे व कान साफ करण्याची ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते, अन्यथा कानाच्या ‘एअर ड्रम’ला छिद्र पडण्याचा धोका असतो.

-डॉ. समीर चौधरी, वरिष्ठ ईएनटी तज्ज्ञ