शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी आता रस्त्यावर लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:39 IST

२००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयाने असंतोष : रविभवनात मंथन, गोवारी शहीद स्मारकावर एल्गार, आंबेडकर सभागृहात परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००४ साली महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा कायदा केला. या कायद्यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षणाच्याविरोधात निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती, जमातीसह, ओबीसी, भटके विमुक्त आदी विविध समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. यासंदर्भात रविवारी नागपुरात बानाईतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उर्वेला कॉलनी येथे परिसंवाद, संघर्ष वाहिनीच्या वतीने झिरो माईल येथील गोवारी शहीद स्मारकावर चर्चासत्र, रविभवनात विविध संघटनांच्यावतीने मंथन करण्यात आले. या बैठकींमध्ये सखोल चर्चा होऊन आरक्षण विरोधक आक्रमकपणे आपली धोरणे राबवित असल्याने संविधानाच्या संरक्षणासाठी आता आक्रमक व्हावेच लागेल, असे मत व्यक्त करीत रस्त्यावरील आंदोलनाचा एकमुखी एल्गार पुकारण्यात आला.आजची सत्ता म्हणजे मनुचा मेकओव्हरभाजपाचे बौद्धिक हे आरएसएस आहे आणि आरएसएसचा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे मनुने जी व्यवस्था निर्माण केली होती, ती पुन्हा लागू करण्याच्या उद्देशाने काम सुरू आहे. आजची सत्ता म्हणजे मनुचा मेकओव्हर होय, अशी टीका बहुजन विचारवंत नागेश चौधरी यांनी केली.आक्रमक व्हा, संघर्ष करापदोन्नतीतील आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अतिशय चिंताजनक आहे. या निर्णयामुळे केवळ अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचेच नव्हे तर भटके -विमुक्तांसह ओबीसींचेही आरक्षण संकटात आले आहे. एकूणच बहुजनांच्याच आरक्षणाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरक्षण विरोधी आक्रमकपणे आपली धोरणे राबवीत आहेत. तेव्हा आपणही आक्रमक झाले पाहिजे. भावी पिढीचे भविष्य लक्षात घेऊन आरक्षणाच्या संरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या आंदोलनात दलित, आदिवासींसोबतच भटके विमुक्त आणि ओबीसी समाजालाही सहभागी करून जनआंदोलन उभारण्यात यावे, असे एकमत आरक्षणाबाबत आयोजित परिसंवादात सहभागी वक्त्यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई)तर्फे रविवारी सायंकाळी उर्वेला कॉलनी वर्धा रोड येथील बानाईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘बहुजन समाजाच्या आरक्षणाचे भविष्य काय?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात माजी मंत्री डॉ. नितीन राऊत हे प्रमुख अतिथी होते. इंजि. विजय मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते तर कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, विद्युत कर्मचारी संघटनेचे नरेंद्र जारोंडे, बहुजन विचारवंत नागेश चौधरी, संघर्ष वाहिनीचे अ‍ॅड. ग्वालबन्शी, ओबीसी समाजाचे दिनेश ढोबे प्रमुख वक्ते होते. डॉ. नितीन राऊत यांनी न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे सांगत, जे कायदे बनवतात तेच यात हस्तक्षेप करून कायद्याला संरक्षण देऊ शकतात, असे स्पष्ट केले. ही केवळ एकट्याची लढाई नाही. केवळ बौद्धांनीच यासाठी पुढाकार घ्यावा का? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित करीत या लढाईत सर्व समाजाने एकजूट व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कृष्णा इंगळे म्हणाले, न्यायालय आम्हाला १०० टक्के न्याय देऊ शकत नाही. तेव्हा आता रस्त्यावर उतरावे लागेल. त्यासाठी समाजातील झोपलेल्या लोकांनाही जागे करावे लागेल. आमचे आमदार, खासदार गप्प का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इंजि. विजय मेश्राम, नरेंद्र जारोंडे, दिनेश ढोबे यांनीही याविरोधात जनआंदोलन व्हावे, अशी भूमिका व्यक्त केली. कुलदीप रामटेके यांनी प्रास्ताविक केले.