शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

आता मुलांनी लढावी शेतकरी बापाची लढाई

By admin | Updated: October 9, 2016 02:32 IST

ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे.

अमर हबीब : दोन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोपनागपूर : ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे. परंतु आज राजकीय नेत्यांपासून तर चित्रपट कलावंतांपर्यंत सर्वच शेतकरी झाले आहेत. पैसा ओतून फुलवलेल्या त्यांच्या मळ्यातील प्रयोगशीलतेच्या कथा सर्वत्र छापून येत आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्याची आत्महत्या आता बातमीचाच विषय राहिलेला नाही. ही विसंगती आजच्या व्यवस्थेने निर्माण केली आहे. ती बदलायची असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी आता या लढ्याचे नेतृत्व करायला पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार अमर हबीब यांनी केले. जनमुक्ती संघर्ष वाहिनी व महाराष्ट्र गांधी स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा भवनात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेचा आज शनिवारी त्यांच्या व्याख्यानाने समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. ‘जनआंदोलनापुढील आव्हाने व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव’ असा आजचा विषय होता. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्यासोबत मंचावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे संयोजक डॉ. प्रकाश तोवर उपस्थित होते. अमर हबीब पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्यांकडे शंकेच्या दृष्टीने बघितले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, गावे संपन्न झाली आहेत. मग शेतकरी का आत्महत्या करतोय, असा प्रश्न विचारला जातोय. हा प्रश्नच चुकीचा आहे. गावातील संपन्नता शेतीच्या उत्पादनातून आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपली मुले शहरात नोकरीसाठी पाठवली त्यांच्या कष्टातून चार पैसे गावातल्या माय-बापांना मिळत आहे. शेतीची दैनावस्था आहे तशीच कायम आहे. त्यात पुन्हा सिलिंगसारख्या कायद्यांनी श्ेतकऱ्यांचे जगणे हराम करून टाकले आहे. शेतकरी संघटित नाही त्यामुळे त्याचा आवाज तितक्या प्रभावीपणे सरकारच्या दरबारात पोहोचत नाही. तो पोहोचवायची ताकदही आता खंगलेल्या शेतकऱ्यांमध्ये फारशी उरलेली नाही. या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करण्यास सरकारला बाध्य करायचे असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे येणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज ८ आॅक्टोबर हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा स्मृतिदिवस असल्याने त्यांनी जेपींच्या जातीअंताच्या लढ्यातील आठवणीही श्रोत्यांना सांगितल्या. या कार्यक्रमाचे संचालन रेखा देवघरे यांनी केले.(प्रतिनिधी)