शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आता मुलांनी लढावी शेतकरी बापाची लढाई

By admin | Updated: October 9, 2016 02:32 IST

ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे.

अमर हबीब : दोन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोपनागपूर : ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे. परंतु आज राजकीय नेत्यांपासून तर चित्रपट कलावंतांपर्यंत सर्वच शेतकरी झाले आहेत. पैसा ओतून फुलवलेल्या त्यांच्या मळ्यातील प्रयोगशीलतेच्या कथा सर्वत्र छापून येत आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्याची आत्महत्या आता बातमीचाच विषय राहिलेला नाही. ही विसंगती आजच्या व्यवस्थेने निर्माण केली आहे. ती बदलायची असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी आता या लढ्याचे नेतृत्व करायला पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार अमर हबीब यांनी केले. जनमुक्ती संघर्ष वाहिनी व महाराष्ट्र गांधी स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा भवनात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेचा आज शनिवारी त्यांच्या व्याख्यानाने समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. ‘जनआंदोलनापुढील आव्हाने व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव’ असा आजचा विषय होता. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्यासोबत मंचावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे संयोजक डॉ. प्रकाश तोवर उपस्थित होते. अमर हबीब पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्यांकडे शंकेच्या दृष्टीने बघितले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, गावे संपन्न झाली आहेत. मग शेतकरी का आत्महत्या करतोय, असा प्रश्न विचारला जातोय. हा प्रश्नच चुकीचा आहे. गावातील संपन्नता शेतीच्या उत्पादनातून आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपली मुले शहरात नोकरीसाठी पाठवली त्यांच्या कष्टातून चार पैसे गावातल्या माय-बापांना मिळत आहे. शेतीची दैनावस्था आहे तशीच कायम आहे. त्यात पुन्हा सिलिंगसारख्या कायद्यांनी श्ेतकऱ्यांचे जगणे हराम करून टाकले आहे. शेतकरी संघटित नाही त्यामुळे त्याचा आवाज तितक्या प्रभावीपणे सरकारच्या दरबारात पोहोचत नाही. तो पोहोचवायची ताकदही आता खंगलेल्या शेतकऱ्यांमध्ये फारशी उरलेली नाही. या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करण्यास सरकारला बाध्य करायचे असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे येणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज ८ आॅक्टोबर हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा स्मृतिदिवस असल्याने त्यांनी जेपींच्या जातीअंताच्या लढ्यातील आठवणीही श्रोत्यांना सांगितल्या. या कार्यक्रमाचे संचालन रेखा देवघरे यांनी केले.(प्रतिनिधी)