शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आता शेतकऱ्यांचीदेखील वीज कापणार; सप्टेंबर २०२० अगोदरच्या थकबाकीदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:50 IST

Nagpur News जर वीज देयक थकीत असेल तर घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसोबतच आता कृषी जोडण्यादेखील कापण्यात येणार आहेत. यासंदर्भात महावितरणने निर्देश जारी केले असून चालू वीज देयक न भरणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देचालू देयक न भरल्यास महावितरण कारवाई करणार

कमल शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जर वीज देयक थकीत असेल तर घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसोबतच आता कृषी जोडण्यादेखील कापण्यात येणार आहेत. यासंदर्भात महावितरणने निर्देश जारी केले असून चालू वीज देयक न भरणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास सांगितले आहे. नोटिशीची मुदत संपल्यानंतर जर शेतकऱ्यांनी देयक भरले नाही तर वीज कापण्यात येणार आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा देण्यात आला असून त्यांच्या जोडण्या कापण्यात येणार नाहीत.

वीज जोडणी कापण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. दररोज आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी वीज जोडण्यांना यातून दूर ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी कृषी पंप वीज जोडणी धोरणाची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकीत देयकावर जोडणी न कापण्याची घोषणा झाली होती. शिवाय थकीत रक्कम बिनव्याजी व विलंब शुल्काविना तीन वर्षांत भरण्याची सुविधा देण्यात आली. परंतु सोमवारी महावितरणने परिपत्रक जारी करून सप्टेंबर व डिसेंबरमध्ये जारी करण्यात आलेले देयक न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. नोटीस जारी करून जोडणी कापण्यात येईल.

४४,७६७ कोटींची थकबाकी

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर महावितरणची एकूण थकीत रक्कम ७१,५०६ कोटींवर पोहोचली आहे. यातील ४४,७६७ कोटींची थकीत रक्कम ही कृषी जोडण्यांची आहे. महावितरणाच्या अहवालानुसार या श्रेणीत राज्यातील ४२ लाख ५० हजार ८१३ ग्राहक आहेत. या जोडण्यांचा उपयोग कृषीपंपांसाठी झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती