शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता हिंगणघाटमधूनही थेट रेल्वेची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 21:14 IST

Nagpur News माता वैष्णोदेवीच्या भक्तांना आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावरूनही रेल्वेगाडीत बसता येईल. चेन्नई आणि जयपूर येथेही थेट जाण्यासाठी या स्थानकावर रेल्वेगाडी थांबणार आहे.

नागपूर : माता वैष्णोदेवीच्या भक्तांना आता वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावरूनही रेल्वेगाडीत बसता येईल. चेन्नई आणि जयपूर येथेही थेट जाण्यासाठी या स्थानकावर रेल्वेगाडी थांबणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे बोर्डाने हिंगणघाटला सहा रेल्वेगाड्यांचा थांबा देण्याचे जाहीर केले असून, रविवार २८ मे पासून त्याची सुरुवात होत आहे.

रेल्वे गाडी क्रमांक १६०३२ श्री माता वैष्णोदेवी कटरा चेन्नई एक्स्प्रेस २८मे रोजी सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी येईल. येथे प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतर दोन मिनिटांनी चेन्नईच्या दिशेने प्रस्थान करील.

त्याचप्रमाणे चेन्नईहून श्री माता वैष्णोदेवी कटराकडे निघालेली रेल्वे गाडी क्रमांक १६०३१ हिंगणघाट रेल्वेस्थानकावर २९ मे रोजी रात्री ११:४२ वाजता येईल. येथे दोन मिनिटांच्या थांब्यात प्रवाशांना उतरवून नवीन प्रवासी घेतल्यानंतर ती कटराकडे निघेल.

अशाच प्रकारे १२९६८ जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस २९ मे रोजी दुपारी ३:३८ वाजता येईल आणि ३ वाजून ४० मिनिटांनी हिंगणघाट स्थानकातून पुढच्या प्रवासाला प्रस्थान करील. १२९६७ चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस २९ मे रोजी सकाळी ९:०३ वाजता हिंगणघाट येथे येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर पुढच्या प्रवासाला निघेल.

रेल्वे गाडी क्रमांक १२५११ गोरखपूर कोचुवेली एक्स्प्रेस २९ मे रोजीच्या सकाळी ५:२८ वाजता हिंगणघाट स्थानकावर येईल आणि ५:३० वाजता पुढच्या प्रवासाला निघेल. त्याचप्रमाणे १२५१२ कोचुवेली गोरखपूर एक्स्प्रेसचे हिंगणघाटच्या रेल्वेस्थानकावर २९ मे रोजी दुपारी २:१३ वाजता आगमन होईल आणि २:१५ वाजता ती येथून प्रस्थान करील.

पुढच्या सहा महिन्यांपर्यंत रेल्वेने हा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.

प्रवाशांना आवाहन

उन्हाळ्यात रेल्वेगाड्यांमध्ये ठिकठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही सोय केली आहे. रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे