शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

आता आले ‘नागरीलिपी’ यू ट्यूब चॅनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 11:11 IST

मराठी व्याकरण तज्ज्ञ दिवाकर मोहनी व त्यांच्या पत्नी सुनंदा मोहनी यांनी देवनागरीलिपी, तिची वर्णमाला, तिच्यातील जोडाक्षरांची रचना समजण्यास सुलभ व्हावे यासाठी व्हिडिओज यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहेत.

ठळक मुद्देमराठीची अनास्था उच्चवर्गीयांमध्येच अधिकमहेश एलकुंचवारांचे परखड मत मोहनी दाम्पत्याच्या ‘नागरीलिपी’ यू-ट्यूब चॅनलचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जो समाज आपल्या भाषेचा आदर बाळगत नाही, तिच्यावर प्रेम करीत नाही तो समाज व त्याची संस्कृती कालांतराने नष्ट होते. दुर्दैवाने मराठी भाषिक समाजामध्ये हेच चित्र दिसून येत आहे. मराठी भाषेबद्दलची प्रचंड अनास्था महाराष्ट्रातील मराठी भाषकांमध्ये आहे. ही अनास्था उच्चवर्णीय, उच्च मध्य वर्गीय आणि मध्य वर्गीयांमध्येच अधिक आहे, असे परखड मत ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केले.मराठी व्याकरण तज्ज्ञ दिवाकर मोहनी व त्यांच्या पत्नी सुनंदा मोहनी यांनी देवनागरीलिपी, तिची वर्णमाला, तिच्यातील जोडाक्षरांची रचना, मराठी भाषेतील संधीनियम, तसेच आपल्या भाषेतील अक्षरगणवृत्ते समजण्यास सुलभ व्हावे यासाठी तयार केलेले व्हिडिओज यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहेत. त्यांच्या ‘नागरीलिपी’ या यू-ट्यूब चॅनलच्या लोकार्पणप्रसंगी एलकुंचवार बोलत होते. याप्रसंगी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी व ज्येष्ठ कवयित्री लीना रस्तोगी प्रामुख्याने उपस्थित होते. एलकुंचवार यांनी अत्यंत खुमासदारपणे विविध उदाहरणे देत मराठी भाषेची कशी मोडतोड होत आहे, हे सांगत अंतर्मुख केले. भाषा ही अहोरात्र डोळ्यात पाणी घालून जपावी लागते. मात्र महाराष्ट्रातील लोकांना भाषा शुद्ध स्वरूपात बोलणे आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी महत्त्वाचे आहे, असे वाटतच नाही. अशुद्ध बोलणे असंस्कृतपणाचे आहे, असे वाटत नाही. ग्रामीण बोलींसाठी हा नियम लागू होत नाही कारण त्यांची बोली ही शुद्ध आहे, मात्र प्रमाण भाषेविषयी ही आस्था निर्माण झाली पाहीजे. यापेक्षा परदेशी माणसे आपली भाषा एकाग्रपणे शिकतात. भारतीय लोकांना आपण बोलतो हे उत्तमच आहे, असे वाटते. उच्चवर्गीयांमध्ये तर आपण बोलतो तेच बरोबर असा अविचारी, अविवेकी दर्प निर्माण झाला आहे. मोठमोठे लेखक, मराठीचे प्राध्यापक बेधडकपणे अशुद्ध मराठीचा वापर करतात, हे त्यांनी उदाहरणासकट सांगितले. याउलट परदेशी माणसे आपल्या भाषांवर संशोधन करायला लागले आहेत. त्यामुळे आपलीच भाषा शिकायला परदेशात जावे लागण्याची वेळ पुढच्या पिढ्यांवर येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.यावेळी श्रीनिवास वरखेडी यांनी दिवाकर मोहनी यांची प्रशंसा करीत मराठी भाषेसाठी त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या उपासनेनंतर मूलभूत स्वरूपाचे काम पूर्ण केल्याची भावना व्यक्त केली. दिवाकर मोहनी यांनीही त्यांचे मनोगत मांडले. संचालन प्राजक्ता अतुल यांनी केले.

येऊ द्या ना मुलांवर ताणसर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली. आता मराठी ऐच्छिक राहणार नाही, याचे स्वागत महेश एलकुंचवार यांनी केले. एक आणखी विषय शिकावा लागल्याने मुलांवर ताण पडेल, असे म्हणणाऱ्यांचाही त्यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. आजची मुले हुशार आहेत व त्यांच्यावर ताण पडणार नाही. आणि ताण आला तर येऊ द्या ना. आम्ही हा ताण घेऊन, रट्टे खाऊनच शिकलो आहोत. एवढी काय चिंता करायची, असा सवाल त्यांनी केला. दिवाकर मोहनी यांनी मूलभूत स्वरुपाचे कार्य केले असून त्यांचे व्हिडिओज शाळांमध्ये शिकविण्यासाठी वापरले जावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाला एलकुंचवार यांनी केले.

टॅग्स :marathiमराठी