शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आता ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची संकल्पना; नितीन गडकरींचा सहकारी बँक संचालकांशी ई-संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:36 IST

केंद्र शासनाने ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुंबई-दिल्ली महामार्गावर विकसित होणार स्मार्ट गाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांचे संचालक, सदस्यांशी ई-संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.मुंबई-दिल्लीदरम्यान १ लाख कोटी रुपयांच्या खर्चातून महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना स्मार्ट गाव विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या दिशेने महाराष्ट्र सरकारनेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे वन व आदिवासी क्षेत्राचा विकास होईल. देशात ७ हजार ५०० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. यातील साडेसातशे किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रातच आहे. राज्यातील १८ टक्के जनता समुद्राजवळच्या पट्ट्यात राहते. आता ट्रॉलर तंत्रज्ञानाने समुद्रात १०० नॉटिकल मैल जाऊन मासेमारी करता येऊ शकणार आहे. सहकारी बँकांनी आता या क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे. एमएसएमईच्या योजनांंतर्गत सहकारी बँकांनादेखील कर्ज देण्यासाठी अधिकृत परवानगी आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.धान्यापासून इथेनॉल बनवावेदेशात गहू, तांदूळ यासारख्या धान्याचा तीन वर्षांचा साठा उपलब्ध आहे. काही धान्य तर अक्षरश: खराब होत आहे. या धान्यापासून इथेनॉल तयार केले पाहिजे. सरकारने धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. साखर कारखान्यांमध्ये साखरेच्या जागी इथेनॉल तयार केल्याने अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथील काही कारखान्यांना पुनरुज्जीवित करण्यात आले तर शेतकऱ्यांवरील संकट दूर होईल. केंद्र एक लाख कोटी रुपयांचे इथेनॉल घ्यायला तयार आहे. परंतु ते उपलब्ध नसल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.सहकार कायद्यात संशोधन आवश्यकसहकार क्षेत्राला सरकारच्या नियंत्रणातून बाहेर काढण्यासाठी कायद्यात संशोधन आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या दिशेने प्रयत्न केले होते. एका सहकारी बँकेला दुसºया बँकेत विलीन करण्याची परवानगी असली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :agricultureशेती