शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची संकल्पना; नितीन गडकरींचा सहकारी बँक संचालकांशी ई-संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:36 IST

केंद्र शासनाने ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुंबई-दिल्ली महामार्गावर विकसित होणार स्मार्ट गाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने ‘अ‍ॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गुरुवारी त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांचे संचालक, सदस्यांशी ई-संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.मुंबई-दिल्लीदरम्यान १ लाख कोटी रुपयांच्या खर्चातून महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना स्मार्ट गाव विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या दिशेने महाराष्ट्र सरकारनेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे वन व आदिवासी क्षेत्राचा विकास होईल. देशात ७ हजार ५०० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. यातील साडेसातशे किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रातच आहे. राज्यातील १८ टक्के जनता समुद्राजवळच्या पट्ट्यात राहते. आता ट्रॉलर तंत्रज्ञानाने समुद्रात १०० नॉटिकल मैल जाऊन मासेमारी करता येऊ शकणार आहे. सहकारी बँकांनी आता या क्षेत्रांकडे लक्ष दिले पाहिजे. एमएसएमईच्या योजनांंतर्गत सहकारी बँकांनादेखील कर्ज देण्यासाठी अधिकृत परवानगी आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.धान्यापासून इथेनॉल बनवावेदेशात गहू, तांदूळ यासारख्या धान्याचा तीन वर्षांचा साठा उपलब्ध आहे. काही धान्य तर अक्षरश: खराब होत आहे. या धान्यापासून इथेनॉल तयार केले पाहिजे. सरकारने धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. साखर कारखान्यांमध्ये साखरेच्या जागी इथेनॉल तयार केल्याने अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथील काही कारखान्यांना पुनरुज्जीवित करण्यात आले तर शेतकऱ्यांवरील संकट दूर होईल. केंद्र एक लाख कोटी रुपयांचे इथेनॉल घ्यायला तयार आहे. परंतु ते उपलब्ध नसल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.सहकार कायद्यात संशोधन आवश्यकसहकार क्षेत्राला सरकारच्या नियंत्रणातून बाहेर काढण्यासाठी कायद्यात संशोधन आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या दिशेने प्रयत्न केले होते. एका सहकारी बँकेला दुसºया बँकेत विलीन करण्याची परवानगी असली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :agricultureशेती