शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

अनुभवांचे वेगळेपण व्यक्त करणारी कादंबरी

By admin | Updated: June 26, 2014 00:55 IST

अश्वमेध ही केवळ राजकीय कादंबरी नाही. विशिष्ट कालखंडात घडणारे समाजवास्तव यात आहे. विनाअनुदानित शाळा अनुदानावर आल्यावर तेथील शिक्षिकांचे शोषण, राजकीय स्थिती यांचे

प्राचार्य रा. र. बोराडे : रवींद्र शोभणे यांच्या ‘अश्वमेध’कादंबरीचे प्रकाशन नागपूर : अश्वमेध ही केवळ राजकीय कादंबरी नाही. विशिष्ट कालखंडात घडणारे समाजवास्तव यात आहे. विनाअनुदानित शाळा अनुदानावर आल्यावर तेथील शिक्षिकांचे शोषण, राजकीय स्थिती यांचे चित्रण करताना यात समाज, शिक्षण, राजकारण आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील वास्तव यात त्यांनी कौशल्याने टिपले आहे. साहित्य हे एकाचवेळी साहित्य आणि तत्कालीन माणसांच्या जगण्याचा इतिहासही असते. डॉ. शोभणे यांची ही कादंबरी अनुभवांचे वेगळेपण अभिव्यक्त करणारी आहे. मराठीतील मैलाचा दगड ठरू शकणारी ही कादंबरी आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. र. बोराडे यांनी अध्यक्षस्थानावरुन व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ आणि मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शोभणे यांच्या अश्वमेध कादंबरीचे प्रकाशन वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनोहर म्हैसाळकर, अशोक कोठावळे, डॉ. आशा सावदेकर, डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि शोभणे उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील सभागृहात पार पडला. डॉ. डहाके म्हणाले, कादंबरीत समाजातील मूल्यऱ्हास मांडला आहे. देशात प्रत्येक स्त्रीचे शोषण आणि त्यात काही स्त्रियाही सहभागी आहेत. प्रत्येक क्षेत्रातल्या सत्तेसाठी माणसे स्वार्थी झाली आहेत. साधारण १०७५ ते ९१ पर्यंतचा काळ यात लेखकाने मांडला आहे. यात पडद्यामधील पात्रे आहेत पण त्यांचे विकसन लेखकाने सूक्ष्मतेने टिपले आहे. विशिष्ट कालखंडाचा सूक्ष्म अभ्यास यातून मिळतो, असे ते म्हणाले. प्रल्हाद लुलेकर म्हणाले, प्रशासन आणि शिक्षणव्यवस्था कशी लाचार आहे, हे कादंबरीत टिपले आहे. आपण संस्कृतीप्रमाणे वागत नाही म्हणूनच संस्कृतीची आठवण येते. स्वार्थासाठी मूल्यांना तिलांजली आणि त्यातून क्रौर्य समाजात येते. ७५ नंतर सर्वच क्षेत्रात अध:पतन झाले. हा त्याचाच पट आहे. अन्न आणि कामक्षुधेने मानसिक संतुलन ढासळते. त्यापलिकडे नैतिक अध:पतन होते. याची मांडणी लेखकाने अभ्यासपूर्ण केली आहे. आशा सावदेकर म्हणाल्या, नागपूर विद्यापीठ, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या आणि त्या अनुषंगाने समाजवास्तव मांडणारी ही कादंबरी मराठीत महत्त्वाची आहे. यातील गुंतागुंत जातींची नव्हे तर मानवी नातेसंबंधांचीच आहे. हे वास्तव विषण्ण करणारे आहे. अशोक कोठावळे यांनी प्रस्तावना, शुभदा फडणवीस यांनी संचालन तर डॉ. शोभणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)