शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कर भरणाऱ्यांनाही नोटीस

By admin | Updated: July 3, 2014 00:50 IST

नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास

मनपाचा विचित्र कारभार : हजारो रुपयांच्या कर आकारणीमुळे नागरिक त्रस्त नागपूर : नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कर विभागातर्फे नागरिकांना कर आकारणीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. परंतु यात मोठा गोंधळ करण्यात करण्यात आला आहे. कवेलू आणि टिनाचे शेड असलेल्या झोपडपट्टीधारकांवर ६ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतची कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरातील हजारो नागरिकांना याच प्रकारची थकबाकीची नोटीस पाठविण्यात आली आहे. उदाहरणार्थ मेकोसाबाग येथील फुलाबाई नीलकंठ गजभिये यांनी २००९ ते २०१२ पर्यंत २४९३ रुपये घर टॅक्स भरला आहे. त्यांच्याकडे त्याची रीतसर पावतीसुद्धा आहे. त्यांच्याकडून २०१२ ते २०१४ या कालावधीतील कर आकारणी करायला हवी होती. परंतु त्यांना २००८ ते २०१४ पर्यंत १४,९०४ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. मेकोसाबाग येथीलच लक्ष्मण गणवीर यांनीसुद्धा गेल्यावर्षी नियमितपणे कर भरला. परंतु त्यांना २०१२ ते २०१४ या कालावधीसाठी ९६६३ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली. याच प्रकारे उत्तर नागपुरातील बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा तर दक्षिण नागपुरातील मानेवाडा, बजरंगनगर आदी परिसरातील नागरिकांना कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)एकाच घरात राहणाऱ्या दोघांना वेगवेगळा कर लुंबिनीनगर येथे भूषण हरिदास पाटील, मनोज हरिदास पाटील यांचे सिमेंट शीटाचे एक घर आहे. एकाच घरात दोघे भाऊ आपल्या परिवारासह वेगवेगळे राहतात. त्यापैकी दोघांनाही कर आकारणीची नोटीस आली. भूषणला २०१० ते २०१४ या कालावधीची एकूण कर आकारणी २०,९६४ रुपये तर त्याच घरात राहणाऱ्या मनोजला मात्र २००८ ते २०१४ या कालावधीसाठी ९१८७ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळ बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा, बजरंगनगर, मानेवाडा येथील नागरिकांनी झोन कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, अधिकारी व्यवस्थित उत्तर न देता टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जायचे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.