शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

कर भरणाऱ्यांनाही नोटीस

By admin | Updated: July 3, 2014 00:50 IST

नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास

मनपाचा विचित्र कारभार : हजारो रुपयांच्या कर आकारणीमुळे नागरिक त्रस्त नागपूर : नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कर विभागातर्फे नागरिकांना कर आकारणीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. परंतु यात मोठा गोंधळ करण्यात करण्यात आला आहे. कवेलू आणि टिनाचे शेड असलेल्या झोपडपट्टीधारकांवर ६ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतची कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरातील हजारो नागरिकांना याच प्रकारची थकबाकीची नोटीस पाठविण्यात आली आहे. उदाहरणार्थ मेकोसाबाग येथील फुलाबाई नीलकंठ गजभिये यांनी २००९ ते २०१२ पर्यंत २४९३ रुपये घर टॅक्स भरला आहे. त्यांच्याकडे त्याची रीतसर पावतीसुद्धा आहे. त्यांच्याकडून २०१२ ते २०१४ या कालावधीतील कर आकारणी करायला हवी होती. परंतु त्यांना २००८ ते २०१४ पर्यंत १४,९०४ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. मेकोसाबाग येथीलच लक्ष्मण गणवीर यांनीसुद्धा गेल्यावर्षी नियमितपणे कर भरला. परंतु त्यांना २०१२ ते २०१४ या कालावधीसाठी ९६६३ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली. याच प्रकारे उत्तर नागपुरातील बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा तर दक्षिण नागपुरातील मानेवाडा, बजरंगनगर आदी परिसरातील नागरिकांना कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)एकाच घरात राहणाऱ्या दोघांना वेगवेगळा कर लुंबिनीनगर येथे भूषण हरिदास पाटील, मनोज हरिदास पाटील यांचे सिमेंट शीटाचे एक घर आहे. एकाच घरात दोघे भाऊ आपल्या परिवारासह वेगवेगळे राहतात. त्यापैकी दोघांनाही कर आकारणीची नोटीस आली. भूषणला २०१० ते २०१४ या कालावधीची एकूण कर आकारणी २०,९६४ रुपये तर त्याच घरात राहणाऱ्या मनोजला मात्र २००८ ते २०१४ या कालावधीसाठी ९१८७ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळ बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा, बजरंगनगर, मानेवाडा येथील नागरिकांनी झोन कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, अधिकारी व्यवस्थित उत्तर न देता टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जायचे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.