शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

खंडपीठाची सीईओंना नोटीस

By admin | Updated: March 6, 2015 00:31 IST

औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे.

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील वडगाव-टोकी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूर करताना नियमांना बगल देण्यात आल्याप्रकरणी दाखल याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे.१७ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, अनुसूचित जाती, जमातीचे व्यक्ती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींकरिता पात्र ठरविण्यात आलेले आहेत. गंगापूर तालुक्यातील वडगाव-टोकी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या २ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या ग्रामसभेने सदर योजनेसाठी लाभार्थ्यांची नावे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गंगापूर यांच्याकडे पाठविली. तसेच २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन नवीन लाभार्थ्यांची दुसरी यादी तयार करून ती गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनी ३९ व्यक्तींच्या वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता देताना शासनाने घालून दिलेल्या निकषाकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब लक्षात येताच याचिकाकर्ता गणेश बोराडे यांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली. ज्या व्यक्तींना विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, ते बागायतदार असल्याचे आणि ज्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा लोकांचा त्यात समावेश करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून सुनावणी तीन आठवड्यांनंतर ठेवली.