शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

जे ५० वर्षांत नाही, ते दोन वर्षांत झाले

By admin | Updated: May 28, 2016 03:00 IST

गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने राज्याला जी मदत केली, एवढी मोठी मदत मागील ५० वर्षांत कधीच केली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आरोग्य महाशिबिराचा ३० हजार रुग्णांना लाभनागपूर : गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने राज्याला जी मदत केली, एवढी मोठी मदत मागील ५० वर्षांत कधीच केली नाही. म्हणूनच आज सर्वत्र विकासाचे पर्व सुरू आहे. विदर्भाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहानसाठी गेल्या १५ वर्षांत साध्या जागेचा मार्ग मोकळा झाला नव्हता ते भाजपाने दोन वर्षांत शक्य करून दाखविले आहे. मिहानच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून हस्तांतरित होणारी जागा लवकरच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला मिळणार आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस व केंद्र शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातर्फे बी. आर. ए. मुंडले शाळेत आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कायदा मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा, केंद्रीय पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री निहालचंद मेघवाल, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर प्रवीण दटके, भाजपाचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, उपमहापौर सतीश होले, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, खासगीतील महागडे उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे बोलले जाते. यामुळे राज्यातील एकही गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी शासन मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा विचार करीत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात एक आरोग्य कक्ष उघडला आहे. या माध्यमातून गेल्या एक वर्षात १८० कोटी रुपये रुग्णांच्या उपचारावर खर्च करण्यात आले. दोन वर्षात केंद्र शासनाने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक व गतिशील शासन देशाला दिले आहे. गडचिरोली रेल्वेसाठी जे १५ वर्षांत जमले नाही ते पंतप्रधान मोदींनी एका बैठकीत साध्य केले. महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वाधिक मदत केलेली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)दोन वर्षांत ८० हजार कोटींचा महसूलमिळाल्याचे केंद्रीय कायदामंत्री गौडा म्हणाले, केंद्राच्या उपाययोजनांमुळे अवघ्या दोन वर्षांत देशाला ८० हजार कोटींचा महसूल करस्वरूपात मिळाला. अशा शिबिरांतून भाजपाचे काम दिसून येते. यावेळी राज्यमंत्री निहालचंद, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक शिबिराचे संयोजक संदीप जोशी यांनी केले. आभार विवेक तरासे यांनी मानले. शिबिराचे सहसंयोजक प्रकाश भोयर उपस्थित होते. या आरोग्य महाशिबिराचा ३० हजार रुग्णांनी लाभ घेतला. डॉक्टरांचा सत्कारकार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, डॉ. सुलतान प्रधान, डॉ. शेखर भोजराज, डॉ. रणजित जगताप, डॉ. संजय ओक, डॉ. अजय चंदनवाडे, डॉ. सीमा पुणतांबेकर, डॉ. अशोक कृपलानी, डॉ. अभय सत्रे, अजय चौरासिया, कैलास शर्मा, एन. एल. सराफ, डॉ. रागिणी पारेख, डॉ. वर्षा बागुल आदींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.