शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 20:42 IST

कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.

ठळक मुद्देनागपूरकरांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.माझ्या प्रामाणिक भावनेचा जनतेने सन्मान केलालोकांची कामे करताना मी कधीही पक्षअभिनिवेष ठेवला नाही. जातीधर्माचा विचार केला नाही. आपल्याकडे कामे घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती ही सर्वप्रथम या देशाची नागरिक आहे, नंतर ती कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, ही प्रामाणिक भावना ठेवून लोकांची मी कामे केली. त्याचेच फळ म्हणून नागपूरकरांनी माझ्या झोळीत मतांचे दान टाकले. पुढील काळात अधिक लोकाभिमुख वागण्याची जबाबदारी नागरिकांनी माझ्यावर टाकली आहे.नागपूरचा नावलौकिक वाढविण्यास कटिबद्धमागील पाच वर्षांत नागपूरचा वेगाने विकास झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघांनीही नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. पुढील पाच वर्षात नागपूरचा जगात नावलौकिक कसा वाढेल या दृष्टीने आमचे सर्वांचेच प्रयत्न राहतील. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल. जनतेने मला साथ दिली व त्यामुळेच विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली.रोजगार निर्मितीवर राहणार भरनागपुरात जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यावर भर राहणार आहे. नागपूर ‘मेट्रो’ला सुरुवात झाल्याने शहराचा दर्जा वाढला आहे. शहरात दर्जेदार राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आल्या आहेत. ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘एचसीएल’ यांच्यासह विविध ‘आयटी’ कंपन्यांचे ‘मिहान’मध्ये काम सुरू झाले आहे. उद्योगधंद्यांना आवश्यक असे पोषक वातावरण येथे तयार झाले आहे. जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या कंपन्यांची नागपूरकडे नजर आहे व भविष्यात नागपुरातील गुंतवणूक नक्कीच वाढेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीinterviewमुलाखत