शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 20:42 IST

कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.

ठळक मुद्देनागपूरकरांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.माझ्या प्रामाणिक भावनेचा जनतेने सन्मान केलालोकांची कामे करताना मी कधीही पक्षअभिनिवेष ठेवला नाही. जातीधर्माचा विचार केला नाही. आपल्याकडे कामे घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती ही सर्वप्रथम या देशाची नागरिक आहे, नंतर ती कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, ही प्रामाणिक भावना ठेवून लोकांची मी कामे केली. त्याचेच फळ म्हणून नागपूरकरांनी माझ्या झोळीत मतांचे दान टाकले. पुढील काळात अधिक लोकाभिमुख वागण्याची जबाबदारी नागरिकांनी माझ्यावर टाकली आहे.नागपूरचा नावलौकिक वाढविण्यास कटिबद्धमागील पाच वर्षांत नागपूरचा वेगाने विकास झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघांनीही नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. पुढील पाच वर्षात नागपूरचा जगात नावलौकिक कसा वाढेल या दृष्टीने आमचे सर्वांचेच प्रयत्न राहतील. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल. जनतेने मला साथ दिली व त्यामुळेच विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली.रोजगार निर्मितीवर राहणार भरनागपुरात जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यावर भर राहणार आहे. नागपूर ‘मेट्रो’ला सुरुवात झाल्याने शहराचा दर्जा वाढला आहे. शहरात दर्जेदार राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आल्या आहेत. ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘एचसीएल’ यांच्यासह विविध ‘आयटी’ कंपन्यांचे ‘मिहान’मध्ये काम सुरू झाले आहे. उद्योगधंद्यांना आवश्यक असे पोषक वातावरण येथे तयार झाले आहे. जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या कंपन्यांची नागपूरकडे नजर आहे व भविष्यात नागपुरातील गुंतवणूक नक्कीच वाढेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीinterviewमुलाखत