शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज ! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. पेट्रोल, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाट वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे केली. इंधन दरवाढ व महागाईविरोधात आयोजित आंदोलनात ते बोलत होते.

काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी गुरुवारी सायकल मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, हुकूमचंद आमधरे, सुरेश भोयर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुपारी १२ वाजता संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी आयोजित सभेत नेत्यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरुद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली.

- पावसामुळे मांडव कोसळला

संविधान चौक येथून हा सायकल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस होता. सकाळी ११ वाजेपासून कार्यकर्ते जमू लागले. छोटेखानी सभेसाठी मांडव टाकण्यात आले होते. पाऊस हळूहळू वाढत होता. मुख्य नेत्यांचे भाषण संपले आणि सायकल मोर्चा निघाला तसाच मांडवाचा एक भाग कोसळला. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.