शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

निवडणूक नव्हे तर निवडच होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST

- विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी : जुन्यांची वर्णी लागणार शतकमहोत्सव समितीत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २००५ सालापासून विदर्भ ...

- विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी : जुन्यांची वर्णी लागणार शतकमहोत्सव समितीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २००५ सालापासून विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी अविरोध स्थानापन्न होत आहे. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असून, ८ फेब्रुवारी रोजी नव्या कार्यकारिणीची विधिवत घोषणा होणार आहे. त्याच अनुषंगाने गेल्या १६ वर्षांची ‘अविरोध’ परंपरा कायम राखण्याचे प्रयत्न विदर्भ साहित्य संघाकडून केले जात आहे.

१४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे स्थापन झालेल्या विदर्भ साहित्य संघाचा ९८वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. १४ जानेवारी २०२२ ते १४ जानेवारी २०२३ हे शतकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने शतकमहोत्सवी समितीची स्थापना करण्यात आली असून, पुढील कार्यकारिणीच्या घोषणेनंतर या समितीची कार्यकारिणी निश्चित होणार आहे. विदर्भ साहित्य संघ आणि विदर्भातील साहित्य वर्तुळाच्या दृष्टीने शतकमहोत्सवी वर्ष अत्यंत महत्त्वाचे असल्याने पुढील कार्यकारिणी निवडणुकीद्वारे स्थानापन्न व्हावी, अशी कुणाचीच इच्छा नाही. त्याच अनुषंगाने अनेक नव्या सदस्यांची वर्णी कार्यकारिणीत लागावी आणि जुन्यांचा सन्मानही राखला जावा, असे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने विद्यमान कार्यकारिणी इच्छुकांची पडताळणी करत आहेत. याचा अर्थ प्रकाश एदलाबादकर, नरेश सब्जीवाले, डॉ. श्रीपाद जोशी, विलास देशपांडे यांच्यासह आणखी काही नावे यंदा नव्या कार्यकारिणीत नसतील, अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, जे कार्यकारिणीत नसतील त्यांना शतकमहोत्सवी समितीची धुरा दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मनोहर म्हैसाळकरांच्या नेतृत्वातच होणार शतकीमहोत्सव

मनोहर म्हैसाळकर विद्यमान अध्यक्ष आहेत आणि २००५-०६ सालापासून त्यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध येत आहे. कार्यकारिणीतील सदस्यांचे फेरबदल होत राहिले तरी त्यात कुणीच खडा टाकल्याचे निदर्शनास आले नाही. मध्यंतरी म्हैसाळकरांनी दोन वेळा निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तसा अर्जही दिला होता. मात्र, म्हैसाळकरांऐवजी दुसऱ्या कुणाच्या हाती सत्ता गेली तर सभासदांमध्ये फूट पडेल आणि विदर्भ साहित्य संघाचे निर्मळ वातावरण संपुष्टात येईल, अशी भीती निर्माण झाली होती. अखेर सर्व सभासद आणि कार्यकारिणीने शतकमहोत्सव त्यांच्याच नेतृत्वात करण्याचा निर्णय घेतला होता. त्या एकमताचा विचार केल्यास यंदा होणारी निवडणूकीही बिनविरोधच पार पडणार, हे जवळपास स्पष्ट आहे.

वामनराव तेलंग झाले होते कार्याध्यक्ष

गेली निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध पार पडली. ठरल्याप्रमाणे म्हैसाळकर अध्यक्ष झाले. मात्र, व्यस्ततेचा कारभार वामनराव तेलंग यांच्या हाती सोपवून त्यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले होते. मात्र, गेल्याच वर्षी तेलंग यांचे निधन झाले आहे. त्यामुळे, यंदा कार्याध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

........