शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी नव्हे, रिपब्लिकन साहित्य म्हणा

By admin | Updated: March 4, 2017 02:04 IST

साहित्य हे विचारांवर आधारित असते, मात्र आता तर विचारच संपवा, असा सूर ऐकायला येत आहे.

अशोक बाबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला नागपूर : साहित्य हे विचारांवर आधारित असते, मात्र आता तर विचारच संपवा, असा सूर ऐकायला येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पुस्तकांमधून त्यांचे विचार लोकांसमोर मांडले आहेत. भारतीय संविधानदेखील त्यांनी अभ्यासलेल्या साहित्यातून जन्माला आले आहे. यामुळे त्यांच्या साहित्याला आंबेडकरी साहित्य न म्हणता रिपब्लिकन साहित्य म्हणावे, असे आवाहन भाषाशास्त्र व साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. प्रदीप आगलावे होते. कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते. डॉ. बाबर म्हणाले, व्यक्तीच्या विचारांची जडणघडण लहान वयातच होते. आंबेडकरांचे विचार हे विद्यापीठात एम.ए. करताना शिकविले जातात, खरे तर ते पाचवी ते सातवी या वर्गांत शिकवायला हवेत. बाबासाहेबांच्या विचारांची सुुरुवात मार्क्सवादापासून होते व ते पुढे बुद्ध विचारापर्यंत जातात. बुद्धांचे विचार हे बायबलमध्ये आहेत, तेच कुराणात आहेत, तसेच ते आपल्या संविधानातही उतरले आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आपण बुद्धांच्या विचारानुसार चालतोे. आंबेडकरी साहित्यातही ग्रामीण, दलित, आदिवासी, अशी विभागवारी केली जाते. हे चुकीचे आहे. हे साहित्य रिपब्लिकन साहित्य म्हणून ओळखले जावे. बाबासाहेबांचे विचार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी लिहिलेले ‘पाकिस्तान आॅर पार्टिशन आॅफ इंडिया’ हे पुस्तक वाचायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, ताराचंद्र खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी) वेगळ्या विदर्भाला पाठिंबा डॉ. अशोक बाबर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत विदर्भ राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, मोठ्या झाडाच्या छायेत असलेल्या लहान झाडाची वाढ का होत नाही या प्रश्नाचे गूढ एका मुलीला उकलता आले नाही. यावर जीवशास्त्राच्या तज्ज्ञाने मोठ्या झाडामुळे सूर्यकिरणे लहान झाडापर्यंत पोहचत नसल्याने वाढ होत नाही, असे सांगून महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झाल्यास त्याचा विकास होईल, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राची तीन राज्ये करावीत असा डॉ. आंबेडकरांचा विचार होता, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.