शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

आंबेडकरी नव्हे, रिपब्लिकन साहित्य म्हणा

By admin | Updated: March 4, 2017 02:04 IST

साहित्य हे विचारांवर आधारित असते, मात्र आता तर विचारच संपवा, असा सूर ऐकायला येत आहे.

अशोक बाबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला नागपूर : साहित्य हे विचारांवर आधारित असते, मात्र आता तर विचारच संपवा, असा सूर ऐकायला येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पुस्तकांमधून त्यांचे विचार लोकांसमोर मांडले आहेत. भारतीय संविधानदेखील त्यांनी अभ्यासलेल्या साहित्यातून जन्माला आले आहे. यामुळे त्यांच्या साहित्याला आंबेडकरी साहित्य न म्हणता रिपब्लिकन साहित्य म्हणावे, असे आवाहन भाषाशास्त्र व साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. प्रदीप आगलावे होते. कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते. डॉ. बाबर म्हणाले, व्यक्तीच्या विचारांची जडणघडण लहान वयातच होते. आंबेडकरांचे विचार हे विद्यापीठात एम.ए. करताना शिकविले जातात, खरे तर ते पाचवी ते सातवी या वर्गांत शिकवायला हवेत. बाबासाहेबांच्या विचारांची सुुरुवात मार्क्सवादापासून होते व ते पुढे बुद्ध विचारापर्यंत जातात. बुद्धांचे विचार हे बायबलमध्ये आहेत, तेच कुराणात आहेत, तसेच ते आपल्या संविधानातही उतरले आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आपण बुद्धांच्या विचारानुसार चालतोे. आंबेडकरी साहित्यातही ग्रामीण, दलित, आदिवासी, अशी विभागवारी केली जाते. हे चुकीचे आहे. हे साहित्य रिपब्लिकन साहित्य म्हणून ओळखले जावे. बाबासाहेबांचे विचार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी लिहिलेले ‘पाकिस्तान आॅर पार्टिशन आॅफ इंडिया’ हे पुस्तक वाचायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, ताराचंद्र खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी) वेगळ्या विदर्भाला पाठिंबा डॉ. अशोक बाबर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत विदर्भ राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, मोठ्या झाडाच्या छायेत असलेल्या लहान झाडाची वाढ का होत नाही या प्रश्नाचे गूढ एका मुलीला उकलता आले नाही. यावर जीवशास्त्राच्या तज्ज्ञाने मोठ्या झाडामुळे सूर्यकिरणे लहान झाडापर्यंत पोहचत नसल्याने वाढ होत नाही, असे सांगून महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झाल्यास त्याचा विकास होईल, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राची तीन राज्ये करावीत असा डॉ. आंबेडकरांचा विचार होता, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.