शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ना मराठवाड्याला, ना विदर्भाला !

By admin | Updated: September 24, 2016 01:11 IST

मराठवाड्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे महसूल विभागाने वनविभागाला पत्र पाठविले आणि चारा विक्री थांबविण्यास लावली.

अखेर चारा सडला : महसूल आणि वन विभागाच्या गलथान कारभाराचा शेतकरी बळीनागपूर : मराठवाड्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे महसूल विभागाने वनविभागाला पत्र पाठविले आणि चारा विक्री थांबविण्यास लावली. त्यापूर्वी एका शेतकऱ्याने वनविभागाकडे रोख रक्कम भरून चारा खरेदीचे कंत्राट घेतले होते. त्याने सहा टन चारा कापूनही ठेवला होता. परंतु विक्री थांबविण्यात आल्यामुळे वनविभागाने त्याला चारा नेऊ दिला नाही. त्याने जिल्हाधिकाऱ्यापासून वनविभागापर्यंत चारा घेऊन जाण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु शासनाचे आदेश दाखवून त्याची अडवणूक केली. शेवटी पावसाळा लागला, हा चारा ना मराठवाड्याच्या दुष्काळी भागात गेला, ना विदर्भातील जनावरांना मिळाला. चारा जागच्या जागी पडून सडून गेला. वनविभागाच्या चांदणी तृण संशोधन केंद्राने ५ आॅगस्ट २०१५ रोजी चारा लिलाव केला. वर्धा जिल्ह्यातील गुंडमुंड गावातील नंदू गावंडे या शेतकऱ्याने ७७४९० रुपये वनविभागाकडे जमा करून चाऱ्याची खरेदी केली. २ सप्टेंबर २०१५ ला त्याला चारा कापण्याचा परवाना मिळाला. वनविभागाच्या २५० एकरातून त्याने मजूर लावून सहा टन चाऱ्याची कटाई केली. त्यातील ५० टक्के चारा नंदूने आपल्या जनावरांच्या उपयोगी आणला. परंतु उर्वरित ५० टक्के चारा असताना, त्याच काळात मराठवाड्यात दुष्काळाचे सावट उभे ठाकले. शासनाच्या महसूल विभागाने वनविभागाला पत्र लिहून चारा खरेदी थांबविण्यास सांगितले. त्यामुळे नंदूने कापून ठेवलेला ५० टक्के चारा घेऊन जाण्यास वनविभागाने इंकार केला. नंदूने जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे चारा मिळावा यासाठी बराच पाठपुरावा केला. परंतु महसूल विभागाचे आदेश दाखवून त्याची अडवणूक करण्यात आली. त्याने लिलावाचे अर्धे पैसे व कटाईसाठी खर्च झालेल्या मजुरीचे पैसे देण्याची मागणी केली. परंतु त्याच्या मागणीकडे दोन्ही विभागाने दुर्लक्ष केले.जून महिन्यापर्यंत कुठलेही उत्तर दोन्ही विभागाकडून आले नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. परंतु कापून ठेवलेला चारा दोन्ही विभागाने मराठवाड्यात पाठविला नाही. शेवटी १६ आॅगस्ट २०१६ ला नंदूला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आले. त्याने कापलेला चारा घेऊन जाण्यास परवानगी दिली. तोपर्यंत चारा पावसामुळे सडून गेलेला होता. तो जनावरांच्या खाण्याच्या कामी नसल्याने नंदू दु:खी झाला. आता त्याने वनविभागाकडे नुकसानभरपाई मागितली आहे. यावर्षीचा लिलाव रद्द करावा, अशी मागणी नंदू गावंडे यांनी पत्रपरिषदेत केली. (प्रतिनिधी)