शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

ना मराठवाड्याला, ना विदर्भाला !

By admin | Updated: September 24, 2016 01:11 IST

मराठवाड्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे महसूल विभागाने वनविभागाला पत्र पाठविले आणि चारा विक्री थांबविण्यास लावली.

अखेर चारा सडला : महसूल आणि वन विभागाच्या गलथान कारभाराचा शेतकरी बळीनागपूर : मराठवाड्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट उभे ठाकले होते. त्यामुळे महसूल विभागाने वनविभागाला पत्र पाठविले आणि चारा विक्री थांबविण्यास लावली. त्यापूर्वी एका शेतकऱ्याने वनविभागाकडे रोख रक्कम भरून चारा खरेदीचे कंत्राट घेतले होते. त्याने सहा टन चारा कापूनही ठेवला होता. परंतु विक्री थांबविण्यात आल्यामुळे वनविभागाने त्याला चारा नेऊ दिला नाही. त्याने जिल्हाधिकाऱ्यापासून वनविभागापर्यंत चारा घेऊन जाण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु शासनाचे आदेश दाखवून त्याची अडवणूक केली. शेवटी पावसाळा लागला, हा चारा ना मराठवाड्याच्या दुष्काळी भागात गेला, ना विदर्भातील जनावरांना मिळाला. चारा जागच्या जागी पडून सडून गेला. वनविभागाच्या चांदणी तृण संशोधन केंद्राने ५ आॅगस्ट २०१५ रोजी चारा लिलाव केला. वर्धा जिल्ह्यातील गुंडमुंड गावातील नंदू गावंडे या शेतकऱ्याने ७७४९० रुपये वनविभागाकडे जमा करून चाऱ्याची खरेदी केली. २ सप्टेंबर २०१५ ला त्याला चारा कापण्याचा परवाना मिळाला. वनविभागाच्या २५० एकरातून त्याने मजूर लावून सहा टन चाऱ्याची कटाई केली. त्यातील ५० टक्के चारा नंदूने आपल्या जनावरांच्या उपयोगी आणला. परंतु उर्वरित ५० टक्के चारा असताना, त्याच काळात मराठवाड्यात दुष्काळाचे सावट उभे ठाकले. शासनाच्या महसूल विभागाने वनविभागाला पत्र लिहून चारा खरेदी थांबविण्यास सांगितले. त्यामुळे नंदूने कापून ठेवलेला ५० टक्के चारा घेऊन जाण्यास वनविभागाने इंकार केला. नंदूने जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे चारा मिळावा यासाठी बराच पाठपुरावा केला. परंतु महसूल विभागाचे आदेश दाखवून त्याची अडवणूक करण्यात आली. त्याने लिलावाचे अर्धे पैसे व कटाईसाठी खर्च झालेल्या मजुरीचे पैसे देण्याची मागणी केली. परंतु त्याच्या मागणीकडे दोन्ही विभागाने दुर्लक्ष केले.जून महिन्यापर्यंत कुठलेही उत्तर दोन्ही विभागाकडून आले नाही. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. परंतु कापून ठेवलेला चारा दोन्ही विभागाने मराठवाड्यात पाठविला नाही. शेवटी १६ आॅगस्ट २०१६ ला नंदूला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आले. त्याने कापलेला चारा घेऊन जाण्यास परवानगी दिली. तोपर्यंत चारा पावसामुळे सडून गेलेला होता. तो जनावरांच्या खाण्याच्या कामी नसल्याने नंदू दु:खी झाला. आता त्याने वनविभागाकडे नुकसानभरपाई मागितली आहे. यावर्षीचा लिलाव रद्द करावा, अशी मागणी नंदू गावंडे यांनी पत्रपरिषदेत केली. (प्रतिनिधी)