शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनानंतर साकार झाला असहकार आश्रम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

कमल शर्मा नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. ...

कमल शर्मा

नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. असहकार आंदाेलन याच अधिवेशनाची देणगी हाेय, ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. नागपुरातही याचा प्रभाव पडला. ज्या क्राॅडक टाऊन परिसरात हे अधिवेशन झाले त्या भागाला आज काँग्रेसनगर म्हणून ओळख मिळाली. या अधिवेशनामुळे एका आश्रमाची निर्मिती झाली, ज्याला असहकार आश्रम म्हणून संबाेधले गेले. मात्र दुर्दैवाने बहुतेकांना याचा विसर पडला.

हे अधिवेशन ३१ डिसेंबर १९२० राेजी संपन्न झाले. असहकार आंदाेलनाची रूपरेखा तयार झाली हाेती. त्यातच शहरात असहकार आश्रम उभारण्याचा विचार पुढे आला. सेठ पूनमचंद राकां (तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ च्या नागपूर अधिवेशनात त्यांना त्यागमूर्ती पदवी दिली हाेती) यांनी सिरसपेठ येथे स्वत:ची जागा दिली आणि आश्रम साकार झाले. त्याची जबाबदारी महात्मा भगवानदीन यांना साेपविण्यात आली. जनरल मंचरशा आवारींसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या आश्रमाशी जुळले हाेते. नागपूरचे माजी खासदार गेव्ह आवारी यांनी माहिती देताना सांगितले, लाेकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ८ एकरांमध्ये हा आश्रम बांधण्यात आला हाेता. आजच्या जनरल मंचरशा आवारी चाैकापासून अशाेक चाैकापर्यंत पसरलेल्या या आश्रमात चरख्यावर सूत कातण्याचे काम हाेत हाेते. पशुपालनासह शेतीही केली जात हाेती. लघु उद्याेगाच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंराेजगाराशी जाेडले जात हाेते. ‘साधे जीवन, उच्च विचार’ असे आश्रमाचे ब्रीद हाेते. जवळच जनरल आवारी यांना जागा देण्यात आली हाेती, ज्या ठिकाणी आजही गेव्ह आवारी यांचे कुटुंब राहते. मात्र देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत असतानाच आश्रमाचे अस्तित्व अस्त व्हायला लागले. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हा आश्रम वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाशी जाेडण्यात आला. आता येथे लाेकांची घरे व इमारती आहेत.

...तर सेवाग्रामपेक्षा जुना असता आश्रम

सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये आश्रमाची स्थापना केली हाेती. मात्र असहकार आश्रम त्यापूर्वीच स्थापण्यात आला. त्यामुळे हा आश्रम असता तर त्याचा इतिहास सेवाग्रामपेक्षा जुना असता. सेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य हाेते पण नागपूरचा आश्रम असहकार आंदाेलनाची देण हाेते. गांधीजी जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा आश्रमात असलेल्या पूनमचंद राकां यांच्या निवासस्थानी थांबायचे, अशी माहिती गेव्ह आवारी यांनी दिली.