शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

अधिवेशनानंतर साकार झाला असहकार आश्रम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

कमल शर्मा नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. ...

कमल शर्मा

नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. असहकार आंदाेलन याच अधिवेशनाची देणगी हाेय, ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. नागपुरातही याचा प्रभाव पडला. ज्या क्राॅडक टाऊन परिसरात हे अधिवेशन झाले त्या भागाला आज काँग्रेसनगर म्हणून ओळख मिळाली. या अधिवेशनामुळे एका आश्रमाची निर्मिती झाली, ज्याला असहकार आश्रम म्हणून संबाेधले गेले. मात्र दुर्दैवाने बहुतेकांना याचा विसर पडला.

हे अधिवेशन ३१ डिसेंबर १९२० राेजी संपन्न झाले. असहकार आंदाेलनाची रूपरेखा तयार झाली हाेती. त्यातच शहरात असहकार आश्रम उभारण्याचा विचार पुढे आला. सेठ पूनमचंद राकां (तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ च्या नागपूर अधिवेशनात त्यांना त्यागमूर्ती पदवी दिली हाेती) यांनी सिरसपेठ येथे स्वत:ची जागा दिली आणि आश्रम साकार झाले. त्याची जबाबदारी महात्मा भगवानदीन यांना साेपविण्यात आली. जनरल मंचरशा आवारींसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या आश्रमाशी जुळले हाेते. नागपूरचे माजी खासदार गेव्ह आवारी यांनी माहिती देताना सांगितले, लाेकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ८ एकरांमध्ये हा आश्रम बांधण्यात आला हाेता. आजच्या जनरल मंचरशा आवारी चाैकापासून अशाेक चाैकापर्यंत पसरलेल्या या आश्रमात चरख्यावर सूत कातण्याचे काम हाेत हाेते. पशुपालनासह शेतीही केली जात हाेती. लघु उद्याेगाच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंराेजगाराशी जाेडले जात हाेते. ‘साधे जीवन, उच्च विचार’ असे आश्रमाचे ब्रीद हाेते. जवळच जनरल आवारी यांना जागा देण्यात आली हाेती, ज्या ठिकाणी आजही गेव्ह आवारी यांचे कुटुंब राहते. मात्र देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत असतानाच आश्रमाचे अस्तित्व अस्त व्हायला लागले. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हा आश्रम वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाशी जाेडण्यात आला. आता येथे लाेकांची घरे व इमारती आहेत.

...तर सेवाग्रामपेक्षा जुना असता आश्रम

सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये आश्रमाची स्थापना केली हाेती. मात्र असहकार आश्रम त्यापूर्वीच स्थापण्यात आला. त्यामुळे हा आश्रम असता तर त्याचा इतिहास सेवाग्रामपेक्षा जुना असता. सेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य हाेते पण नागपूरचा आश्रम असहकार आंदाेलनाची देण हाेते. गांधीजी जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा आश्रमात असलेल्या पूनमचंद राकां यांच्या निवासस्थानी थांबायचे, अशी माहिती गेव्ह आवारी यांनी दिली.