शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनानंतर साकार झाला असहकार आश्रम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

कमल शर्मा नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. ...

कमल शर्मा

नागपूर : १९२० साली २६ ते ३१ डिसेंबर या काळात नागपुरात झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरले. असहकार आंदाेलन याच अधिवेशनाची देणगी हाेय, ज्यामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. नागपुरातही याचा प्रभाव पडला. ज्या क्राॅडक टाऊन परिसरात हे अधिवेशन झाले त्या भागाला आज काँग्रेसनगर म्हणून ओळख मिळाली. या अधिवेशनामुळे एका आश्रमाची निर्मिती झाली, ज्याला असहकार आश्रम म्हणून संबाेधले गेले. मात्र दुर्दैवाने बहुतेकांना याचा विसर पडला.

हे अधिवेशन ३१ डिसेंबर १९२० राेजी संपन्न झाले. असहकार आंदाेलनाची रूपरेखा तयार झाली हाेती. त्यातच शहरात असहकार आश्रम उभारण्याचा विचार पुढे आला. सेठ पूनमचंद राकां (तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ च्या नागपूर अधिवेशनात त्यांना त्यागमूर्ती पदवी दिली हाेती) यांनी सिरसपेठ येथे स्वत:ची जागा दिली आणि आश्रम साकार झाले. त्याची जबाबदारी महात्मा भगवानदीन यांना साेपविण्यात आली. जनरल मंचरशा आवारींसह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते या आश्रमाशी जुळले हाेते. नागपूरचे माजी खासदार गेव्ह आवारी यांनी माहिती देताना सांगितले, लाेकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ८ एकरांमध्ये हा आश्रम बांधण्यात आला हाेता. आजच्या जनरल मंचरशा आवारी चाैकापासून अशाेक चाैकापर्यंत पसरलेल्या या आश्रमात चरख्यावर सूत कातण्याचे काम हाेत हाेते. पशुपालनासह शेतीही केली जात हाेती. लघु उद्याेगाच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंराेजगाराशी जाेडले जात हाेते. ‘साधे जीवन, उच्च विचार’ असे आश्रमाचे ब्रीद हाेते. जवळच जनरल आवारी यांना जागा देण्यात आली हाेती, ज्या ठिकाणी आजही गेव्ह आवारी यांचे कुटुंब राहते. मात्र देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत असतानाच आश्रमाचे अस्तित्व अस्त व्हायला लागले. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हा आश्रम वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाशी जाेडण्यात आला. आता येथे लाेकांची घरे व इमारती आहेत.

...तर सेवाग्रामपेक्षा जुना असता आश्रम

सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये आश्रमाची स्थापना केली हाेती. मात्र असहकार आश्रम त्यापूर्वीच स्थापण्यात आला. त्यामुळे हा आश्रम असता तर त्याचा इतिहास सेवाग्रामपेक्षा जुना असता. सेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य हाेते पण नागपूरचा आश्रम असहकार आंदाेलनाची देण हाेते. गांधीजी जेव्हा नागपूरला यायचे तेव्हा आश्रमात असलेल्या पूनमचंद राकां यांच्या निवासस्थानी थांबायचे, अशी माहिती गेव्ह आवारी यांनी दिली.