शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

युद्ध नको, आत्मरक्षणाची सज्जता हवी

By admin | Updated: January 16, 2015 01:01 IST

जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या

पुस्तक प्रकाशन : ताराचंद्र खांडेकर यांचे प्रतिपादन नागपूर : जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या आत्मरक्षणाचासुद्धा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व समीक्षक ताराचंद्र खांडेकर यांनी केले. अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर लिखित ‘द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी सायंकाळी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खांडेकर बोलत होते. डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे समता संगरतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर होते तर आंबेडकरी विचारवंत डॉ. विमलकीर्ती हे प्रमुख अतिथी होते. खांडेकर म्हणाले, बाबासाहेबांचे युद्धासंबंधीचे विचार अतिशय मौलिक होते. परंतु त्यांचे ते विचार अनुल्लेखाने मारल्या गेले. बाबासाहेबांनी युद्ध नाकारले, हे अर्धसत्य आहे. संरक्षणासाठीच त्यांनी समाजामध्ये लष्करी सज्जतेची बीजे रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सैनिकीकरण हवे होते. आजचा विचार केल्यास समाजाला आत्मरक्षणासाठी या सैनिकी सज्जतेची अधिक गरज असल्याचे दिसून येत.डॉ. विमलकीर्ती यांनी जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा असल्याचे स्पष्ट करीत अहिंसेच्या मार्गानेसुद्धा परिवर्तन घडवून आणता येते, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले असल्याचे स्पष्ट केले. राजेश भारती यांनी संचालन केले. सुनील सारीपुत्र यांनी भूमिका विशद केली आणि आभार मानले. (प्रतिनिधी)केतन पिंपळापुरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित याप्रसंगी कवी केतन पिपंळापुरे यांना विश्वेंदू जयभीम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच मुंबईतील मिलिंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. पद्माकर तामगाडगे यांना भीमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच युवा चित्रकार महेश मानकर यांचा अजिंठा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंदिरा पिंपळापुरे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.