शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

युद्ध नको, आत्मरक्षणाची सज्जता हवी

By admin | Updated: January 16, 2015 01:01 IST

जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या

पुस्तक प्रकाशन : ताराचंद्र खांडेकर यांचे प्रतिपादन नागपूर : जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या आत्मरक्षणाचासुद्धा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व समीक्षक ताराचंद्र खांडेकर यांनी केले. अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर लिखित ‘द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी सायंकाळी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खांडेकर बोलत होते. डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे समता संगरतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर होते तर आंबेडकरी विचारवंत डॉ. विमलकीर्ती हे प्रमुख अतिथी होते. खांडेकर म्हणाले, बाबासाहेबांचे युद्धासंबंधीचे विचार अतिशय मौलिक होते. परंतु त्यांचे ते विचार अनुल्लेखाने मारल्या गेले. बाबासाहेबांनी युद्ध नाकारले, हे अर्धसत्य आहे. संरक्षणासाठीच त्यांनी समाजामध्ये लष्करी सज्जतेची बीजे रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सैनिकीकरण हवे होते. आजचा विचार केल्यास समाजाला आत्मरक्षणासाठी या सैनिकी सज्जतेची अधिक गरज असल्याचे दिसून येत.डॉ. विमलकीर्ती यांनी जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा असल्याचे स्पष्ट करीत अहिंसेच्या मार्गानेसुद्धा परिवर्तन घडवून आणता येते, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले असल्याचे स्पष्ट केले. राजेश भारती यांनी संचालन केले. सुनील सारीपुत्र यांनी भूमिका विशद केली आणि आभार मानले. (प्रतिनिधी)केतन पिंपळापुरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित याप्रसंगी कवी केतन पिपंळापुरे यांना विश्वेंदू जयभीम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच मुंबईतील मिलिंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. पद्माकर तामगाडगे यांना भीमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच युवा चित्रकार महेश मानकर यांचा अजिंठा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंदिरा पिंपळापुरे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.