शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेतकऱ्यांनाे पेरणीचे ‘नाे टेन्शन’; कापूस, साेयाबीन पेरणी १६ जुलैपर्यंत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 07:30 IST

Nagpur News पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

ठळक मुद्देराज्यात सर्वदूर पावसाची दडीराज्यात १४० पैकी केवळ १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी आटाेपली

सुनील चरपे

नागपूर : मृग पूर्ण व अर्धे आर्द्रा नक्षत्र काेरडे गेले आहे. राज्यात सर्वदूर पेरणीयाेग्य पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यात किमान १४० लाख हेक्टरपैकी १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, विदर्भ, खान्देश व मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

राज्यात १० जूनपर्यंत सरासरी ७० मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना यावर्षी १३.५ मिमी काेसळला. मागील वर्षी याच काळात ६८.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. २० जूनपर्यंत सरासरी १३८.४ मिमी पाऊस काेसळताे. यावर्षी ६०.१ मिमी पाऊस झाला असून, मागील वर्षी २१६ मिमी पाऊस काेसळला हाेता. ३० जूनपर्यंत सरासरी २८२.१ मिमी पाऊस काेसळताे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत २८२.१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. यावर्षी २८ जूनपर्यंत राज्यात सरासरी १९३.८ मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना १३४.६ मिमी पाऊस काेसळला. मागील वर्षी याच काळात १३९.७ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

विशेष म्हणजे हा पाऊस पेरणीयाेग्य नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली. राज्यात २७ जूनपर्यंत १२.२ टक्के पेरणी आटाेपली असून, यात धूळ पेरणीचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात ८७.८ टक्के पेरणी अद्याप व्हायची आहे.

पेरणीयाेग्य काळ व उत्पादनावरील परिणाम

कृषी विभागाच्या पीक कॅलेंडरनुसार(२ जानेवारीपासून) राज्यात कपाशी व साेयाबीनच्या पेरणीचा याेग्य काळ हा सरासरी २३ ते २८ व्या आठवड्यादरम्यान म्हणजेच १२ जून ते १६ जुलै, तर धानाचा पेरणीयोग्य काळ हा २७ ते ३० आठवड्यांचा म्हणजेच ३ ते ३० जुलै दरम्यानचा आहे. या काळात कपाशी, साेयाबीन व धानाच्या पिकांची पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम हाेत नाही. त्यानंतर पेरणी केल्यास पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते.

पिकांना पावसाची गरज

कपाशीला जून व जुलैमध्ये सरासरी ८२.४ ते १२६ मिमी, ऑगस्टमध्ये १०१.३ ते १६१.० मिमी, सप्टेंबर-ऑक्टाेबरमध्ये २२५.४४ ते ३२५.७ मिमी पावसाची गरज असते. साेयाबीनच्या पिकाला जून-जुलैमध्ये सरासरी ४६.९ मिमी, सप्टेंबरमध्ये १३७.७ मिमी, ऑक्टाेबरमध्ये ७७.४ मिमी आणि त्यानंतरच्या काळात ४५.७ मिमी पावसाची आवश्यकता असते. धानाच्या पिकाला जुलैमध्ये सरासरी १४७.३ ते १८८.२ मिमी, तर ऑगस्टमध्ये ११९.३ मिमी ते २५५.५ मिमी पावसाची आवश्यकता असते.

उशिरा पेरणीचा साेयाबीनला धाेका

१६ जुलैनंतर पेरणी झाल्यास साेयाबीनच्या पिकाला कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचा धाेका उद्भवू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १६ जुलैनंतर साेयाबीनची पेरणी करणे टाळावे. त्याला पर्याय म्हणून मका किंवा कपाशीची निवड करावी. विदर्भात धानाचे पीकही परतीच्या पावसामुळे खराब हाेऊ शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरण असल्यास काही प्रमाणात कपाशीच्या पात्या व बाेंडगळ हाेऊ शकते, अशी माहिती यवतमाळ येथील शेतकरी मिलिंद दामले यांच्यासह कृषी विभागाने दिली.

...

टॅग्स :agricultureशेती