शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनाे पेरणीचे ‘नाे टेन्शन’; कापूस, साेयाबीन पेरणी १६ जुलैपर्यंत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 07:30 IST

Nagpur News पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

ठळक मुद्देराज्यात सर्वदूर पावसाची दडीराज्यात १४० पैकी केवळ १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी आटाेपली

सुनील चरपे

नागपूर : मृग पूर्ण व अर्धे आर्द्रा नक्षत्र काेरडे गेले आहे. राज्यात सर्वदूर पेरणीयाेग्य पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यात किमान १४० लाख हेक्टरपैकी १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, विदर्भ, खान्देश व मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

राज्यात १० जूनपर्यंत सरासरी ७० मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना यावर्षी १३.५ मिमी काेसळला. मागील वर्षी याच काळात ६८.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. २० जूनपर्यंत सरासरी १३८.४ मिमी पाऊस काेसळताे. यावर्षी ६०.१ मिमी पाऊस झाला असून, मागील वर्षी २१६ मिमी पाऊस काेसळला हाेता. ३० जूनपर्यंत सरासरी २८२.१ मिमी पाऊस काेसळताे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत २८२.१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. यावर्षी २८ जूनपर्यंत राज्यात सरासरी १९३.८ मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना १३४.६ मिमी पाऊस काेसळला. मागील वर्षी याच काळात १३९.७ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

विशेष म्हणजे हा पाऊस पेरणीयाेग्य नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली. राज्यात २७ जूनपर्यंत १२.२ टक्के पेरणी आटाेपली असून, यात धूळ पेरणीचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात ८७.८ टक्के पेरणी अद्याप व्हायची आहे.

पेरणीयाेग्य काळ व उत्पादनावरील परिणाम

कृषी विभागाच्या पीक कॅलेंडरनुसार(२ जानेवारीपासून) राज्यात कपाशी व साेयाबीनच्या पेरणीचा याेग्य काळ हा सरासरी २३ ते २८ व्या आठवड्यादरम्यान म्हणजेच १२ जून ते १६ जुलै, तर धानाचा पेरणीयोग्य काळ हा २७ ते ३० आठवड्यांचा म्हणजेच ३ ते ३० जुलै दरम्यानचा आहे. या काळात कपाशी, साेयाबीन व धानाच्या पिकांची पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम हाेत नाही. त्यानंतर पेरणी केल्यास पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते.

पिकांना पावसाची गरज

कपाशीला जून व जुलैमध्ये सरासरी ८२.४ ते १२६ मिमी, ऑगस्टमध्ये १०१.३ ते १६१.० मिमी, सप्टेंबर-ऑक्टाेबरमध्ये २२५.४४ ते ३२५.७ मिमी पावसाची गरज असते. साेयाबीनच्या पिकाला जून-जुलैमध्ये सरासरी ४६.९ मिमी, सप्टेंबरमध्ये १३७.७ मिमी, ऑक्टाेबरमध्ये ७७.४ मिमी आणि त्यानंतरच्या काळात ४५.७ मिमी पावसाची आवश्यकता असते. धानाच्या पिकाला जुलैमध्ये सरासरी १४७.३ ते १८८.२ मिमी, तर ऑगस्टमध्ये ११९.३ मिमी ते २५५.५ मिमी पावसाची आवश्यकता असते.

उशिरा पेरणीचा साेयाबीनला धाेका

१६ जुलैनंतर पेरणी झाल्यास साेयाबीनच्या पिकाला कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचा धाेका उद्भवू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १६ जुलैनंतर साेयाबीनची पेरणी करणे टाळावे. त्याला पर्याय म्हणून मका किंवा कपाशीची निवड करावी. विदर्भात धानाचे पीकही परतीच्या पावसामुळे खराब हाेऊ शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरण असल्यास काही प्रमाणात कपाशीच्या पात्या व बाेंडगळ हाेऊ शकते, अशी माहिती यवतमाळ येथील शेतकरी मिलिंद दामले यांच्यासह कृषी विभागाने दिली.

...

टॅग्स :agricultureशेती