शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

शेतकऱ्यांनाे पेरणीचे ‘नाे टेन्शन’; कापूस, साेयाबीन पेरणी १६ जुलैपर्यंत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 07:30 IST

Nagpur News पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

ठळक मुद्देराज्यात सर्वदूर पावसाची दडीराज्यात १४० पैकी केवळ १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी आटाेपली

सुनील चरपे

नागपूर : मृग पूर्ण व अर्धे आर्द्रा नक्षत्र काेरडे गेले आहे. राज्यात सर्वदूर पेरणीयाेग्य पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यात किमान १४० लाख हेक्टरपैकी १५.४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, विदर्भ, खान्देश व मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. पावसाने दडी मारली असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, कपाशी, साेयाबीन आणि धान या प्रमुख पिकांची पेरणी २२ ते ३० आठवड्यांमध्ये म्हणजेच १६ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

राज्यात १० जूनपर्यंत सरासरी ७० मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना यावर्षी १३.५ मिमी काेसळला. मागील वर्षी याच काळात ६८.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. २० जूनपर्यंत सरासरी १३८.४ मिमी पाऊस काेसळताे. यावर्षी ६०.१ मिमी पाऊस झाला असून, मागील वर्षी २१६ मिमी पाऊस काेसळला हाेता. ३० जूनपर्यंत सरासरी २८२.१ मिमी पाऊस काेसळताे. मागील वर्षी ३० जूनपर्यंत २८२.१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली हाेती. यावर्षी २८ जूनपर्यंत राज्यात सरासरी १९३.८ मिमी पावसाची नाेंद हाेणे अपेक्षित असताना १३४.६ मिमी पाऊस काेसळला. मागील वर्षी याच काळात १३९.७ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.

विशेष म्हणजे हा पाऊस पेरणीयाेग्य नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली. राज्यात २७ जूनपर्यंत १२.२ टक्के पेरणी आटाेपली असून, यात धूळ पेरणीचा समावेश आहे. पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्यांच्या डाेक्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात ८७.८ टक्के पेरणी अद्याप व्हायची आहे.

पेरणीयाेग्य काळ व उत्पादनावरील परिणाम

कृषी विभागाच्या पीक कॅलेंडरनुसार(२ जानेवारीपासून) राज्यात कपाशी व साेयाबीनच्या पेरणीचा याेग्य काळ हा सरासरी २३ ते २८ व्या आठवड्यादरम्यान म्हणजेच १२ जून ते १६ जुलै, तर धानाचा पेरणीयोग्य काळ हा २७ ते ३० आठवड्यांचा म्हणजेच ३ ते ३० जुलै दरम्यानचा आहे. या काळात कपाशी, साेयाबीन व धानाच्या पिकांची पेरणी केल्यास पिकांच्या उत्पादनावर फारसा परिणाम हाेत नाही. त्यानंतर पेरणी केल्यास पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता असते.

पिकांना पावसाची गरज

कपाशीला जून व जुलैमध्ये सरासरी ८२.४ ते १२६ मिमी, ऑगस्टमध्ये १०१.३ ते १६१.० मिमी, सप्टेंबर-ऑक्टाेबरमध्ये २२५.४४ ते ३२५.७ मिमी पावसाची गरज असते. साेयाबीनच्या पिकाला जून-जुलैमध्ये सरासरी ४६.९ मिमी, सप्टेंबरमध्ये १३७.७ मिमी, ऑक्टाेबरमध्ये ७७.४ मिमी आणि त्यानंतरच्या काळात ४५.७ मिमी पावसाची आवश्यकता असते. धानाच्या पिकाला जुलैमध्ये सरासरी १४७.३ ते १८८.२ मिमी, तर ऑगस्टमध्ये ११९.३ मिमी ते २५५.५ मिमी पावसाची आवश्यकता असते.

उशिरा पेरणीचा साेयाबीनला धाेका

१६ जुलैनंतर पेरणी झाल्यास साेयाबीनच्या पिकाला कापणीच्यावेळी परतीच्या पावसाचा धाेका उद्भवू शकताे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १६ जुलैनंतर साेयाबीनची पेरणी करणे टाळावे. त्याला पर्याय म्हणून मका किंवा कपाशीची निवड करावी. विदर्भात धानाचे पीकही परतीच्या पावसामुळे खराब हाेऊ शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यात सतत ढगाळ वातावरण असल्यास काही प्रमाणात कपाशीच्या पात्या व बाेंडगळ हाेऊ शकते, अशी माहिती यवतमाळ येथील शेतकरी मिलिंद दामले यांच्यासह कृषी विभागाने दिली.

...

टॅग्स :agricultureशेती