शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

आधार नाही, तर आहार नाही!

By admin | Updated: July 12, 2017 02:38 IST

आले सरकारच्या मना, तिथे कोणाचे चालेना...असेच सध्या सुरू आहे. सरकारी योजनाच्या यशस्वी क्रियान्वनासाठी आधार कार्ड

सरकारच्या धोरणाचा गरिबांना फटका : तांड्या-पाड्यावर जगणाऱ्या गरीब, अज्ञानी लोकांची थट्टा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आले सरकारच्या मना, तिथे कोणाचे चालेना...असेच सध्या सुरू आहे. सरकारी योजनाच्या यशस्वी क्रियान्वनासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असेल तरी ते नेमके कुठेकुठे आवश्यक करावे, याचे पुरते ज्ञान सरकारला नसल्याने त्याचा फटका गरीब, निरक्षर लोकांना बसत आहे. याच क्रमात आता सरकारने अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देताना आधाराची अट टाक ली आहे. आधार नाही, तर आहार नाही अशी भूमिका सरकारने घेतल्याने तांडया-पाडयावर जगणाऱ्या हजारो गरीब मुलांना पोषण आहाराला मुकावे लागणार आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. अंगणवाडीत येणारे बहुतांश बालक हे झोपडपट्टीत, मागास भागातून येत असतात. पालकांमध्ये असलेला अशिक्षितपणा, अज्ञान यामुळे त्यांच्या पालकांकडे सुद्धा आधार कार्ड उपलब्ध नसते. अशात शासनाने आधारची अट टाकल्याने, मुलांना पोषण आहार देणार कसा, असा सवाल अंगणवाडी सेविकांकडून विचारला जात आहे. अंगणवाडीच्या बाबतीत शासनाचे धोरणच उदासीन आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येतात. शून्य ते सहा वयोगटांच्या बालकांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण येथून देण्यात येते. त्याचबरोबर गरोदर माता, किशोरवयीन मुलींचे पोषण अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांच्या माध्यमातून अंगणवाड्याचे काम चालते. अंगणवाडीत काम करणाऱ्या दोन महिलांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण याबरोबरच जनगणना, लसीकरण, नवजात मुलांची माहिती, बीएलओचे काम, पेन्शन कार्य, ओळख पत्र आदी कामे करवून घेतली जातात. अशात आता सरकार अंगणवाड्यांचे खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. याला अंगणवाडी सेविकांचा विरोध आहे.