शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

आधार नाही, तर आहार नाही!

By admin | Updated: July 12, 2017 02:38 IST

आले सरकारच्या मना, तिथे कोणाचे चालेना...असेच सध्या सुरू आहे. सरकारी योजनाच्या यशस्वी क्रियान्वनासाठी आधार कार्ड

सरकारच्या धोरणाचा गरिबांना फटका : तांड्या-पाड्यावर जगणाऱ्या गरीब, अज्ञानी लोकांची थट्टा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आले सरकारच्या मना, तिथे कोणाचे चालेना...असेच सध्या सुरू आहे. सरकारी योजनाच्या यशस्वी क्रियान्वनासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असेल तरी ते नेमके कुठेकुठे आवश्यक करावे, याचे पुरते ज्ञान सरकारला नसल्याने त्याचा फटका गरीब, निरक्षर लोकांना बसत आहे. याच क्रमात आता सरकारने अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देताना आधाराची अट टाक ली आहे. आधार नाही, तर आहार नाही अशी भूमिका सरकारने घेतल्याने तांडया-पाडयावर जगणाऱ्या हजारो गरीब मुलांना पोषण आहाराला मुकावे लागणार आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. अंगणवाडीत येणारे बहुतांश बालक हे झोपडपट्टीत, मागास भागातून येत असतात. पालकांमध्ये असलेला अशिक्षितपणा, अज्ञान यामुळे त्यांच्या पालकांकडे सुद्धा आधार कार्ड उपलब्ध नसते. अशात शासनाने आधारची अट टाकल्याने, मुलांना पोषण आहार देणार कसा, असा सवाल अंगणवाडी सेविकांकडून विचारला जात आहे. अंगणवाडीच्या बाबतीत शासनाचे धोरणच उदासीन आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येतात. शून्य ते सहा वयोगटांच्या बालकांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण येथून देण्यात येते. त्याचबरोबर गरोदर माता, किशोरवयीन मुलींचे पोषण अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांच्या माध्यमातून अंगणवाड्याचे काम चालते. अंगणवाडीत काम करणाऱ्या दोन महिलांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण याबरोबरच जनगणना, लसीकरण, नवजात मुलांची माहिती, बीएलओचे काम, पेन्शन कार्य, ओळख पत्र आदी कामे करवून घेतली जातात. अशात आता सरकार अंगणवाड्यांचे खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. याला अंगणवाडी सेविकांचा विरोध आहे.