शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

विलंब माफीसाठी स्वतंत्र अर्जाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यघटनेतील आर्टिकल २२६ अंतर्गत दिलेल्या आदेशावर पुनर्विचार व्हावा, याकरिता अर्ज सादर करण्यास ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यघटनेतील आर्टिकल २२६ अंतर्गत दिलेल्या आदेशावर पुनर्विचार व्हावा, याकरिता अर्ज सादर करण्यास ३० दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास, तो विलंब माफ व्हावा, यासाठी लिमिटेशन ॲक्टमधील आर्टिकल १२४ अनुसार स्वतंत्र अर्ज सादर करण्याची गरज नाही, असे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालय सामान्यत: वादग्रस्त आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर दाखल होणारे पुनर्विचार अर्ज स्वीकारत नाहीत; परंतु विलंब होण्यास ठोस कारण असल्यास व त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाल्यास पुनर्विचार अर्ज सुनावणीसाठी स्वीकारले जातात. विलंबाचे कारण संबंधित पुनर्विचार अर्जातच स्पष्ट केले जाऊ शकते. त्यासाठी लिमिटेशन ॲक्टमधील आर्टिकल १२४ अनुसार स्वतंत्र अर्ज सादर करून विलंब माफीची विनंती करण्याची गरज नाही, असे या न्यायपीठाने पुढे नमूद केले. लक्ष्मीकांत खाडे यांच्या प्रकरणामध्ये पुनर्विचार अर्ज दाखल करण्यास २३ दिवसांचा विलंब झाल्यामुळे ॲड. मोहन सुदामे यांनी विलंबमाफीचा स्वतंत्र अर्ज सादर केला होता. त्यात उच्च न्यायालयाने ही कायदेशीर बाब स्पष्ट केली.