शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ना शाळा, ना परीक्षा; ८ लाख ७२ हजार विद्यार्थी पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने शिक्षण क्षेत्राची पुरती दुरावस्था ...

नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने शिक्षण क्षेत्राची पुरती दुरावस्था केली आहे. वर्षभरात शाळा सुरू झाल्या नाही, वर्ग सुरू होऊ शकले नाहीत, सरकारला परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. काही शाळांमध्ये ऑनलाईन शिकविले गेले. पण परीक्षाच झाली नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होऊ शकले नाही. जिल्ह्यात पहिली ते दहावीचे जवळपास ८ लाख ७२ हजार ६३२ विद्यार्थी आहेत जे परीक्षेविना पास झाले आहेत.

डिसेंबर २०२० मध्ये शासनाने नववी-दहावीच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. परंतु कोरोनामुळे तो फसला. मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाची लाट इतकी उसळली की, हजारो लोकांचे जीव गेले. विदर्भातील शाळा यंदा २८ जून रोजी उघडणार आहेत. पण शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची रिस्क घेतली नाही. २८ जूनपासून शिक्षक मात्र उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही. पण शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळेने दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आरटीईचा शेरा मारला आहे.

- जिल्ह्यातील शाळा

जिल्हा परिषद - १५३०

महानगरपालिका - १५६

नगरपालिका - ६८

खासगी अनुदानित शाळा - १२०२

विना अनुदानित शाळा - ११५५

एकुण विद्यार्थी - ८,७२,६३२

- ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

कोरोनाच्या संसर्गात शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हे एकमेव माध्यम ठरू शकले. यामुळे देशातील, जगातील शिक्षक विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधू शकतात. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षण केंद्रे बंद होती. त्यामुळे मुलांना घरबसल्या शिकता आले. ऑनलाईन वर्गात शिक्षकांचा एखादा मुद्दा न समजल्यास, रेकॉर्ड केलेले लेक्चर विद्यार्थी पुन्हा पाहू शकतो. अभ्यासातील काही गोष्टी समजल्या नाही, तर गुगलवर सोप्या भाषेत शोधू शकतो.

- ऑनलाईन शिक्षणाचे तोटे

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य असते. शिक्षक नेमके काय शिकवित आहे, अनेकदा विद्यार्थ्यांना कळत नाही. ऑनलाईन शिक्षण वन-वे कम्युनिकेशन असते. मुलांचे मन विचलित होऊ शकते, शिस्तीची कमतरता असते. मागास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहे.

- ग्रामीणमध्ये ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण संसाधनांची आहे. त्याचबरोबर नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा सुद्धा मोठा त्रास आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक असो की विद्यार्थी यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये ७० टक्के विद्यार्थी गेल्या सत्रात शिक्षणापासून वंचित होते. शहरामध्ये काही नामांकित शाळेत ऑनलाईन शिक्षण झाले. पण विद्यार्थ्यांनी त्यांना किती सकारात्मक प्रतिसाद दिला. याचे मूल्यांकन होऊ शकले नाही. परीक्षा झाली असती तर ऑनलाईन शिक्षणाची सकारात्मकता दिसून आली असती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.