शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

ना शाळा, ना परीक्षा; ८ लाख ७२ हजार विद्यार्थी पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने शिक्षण क्षेत्राची पुरती दुरावस्था ...

नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने शिक्षण क्षेत्राची पुरती दुरावस्था केली आहे. वर्षभरात शाळा सुरू झाल्या नाही, वर्ग सुरू होऊ शकले नाहीत, सरकारला परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. काही शाळांमध्ये ऑनलाईन शिकविले गेले. पण परीक्षाच झाली नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होऊ शकले नाही. जिल्ह्यात पहिली ते दहावीचे जवळपास ८ लाख ७२ हजार ६३२ विद्यार्थी आहेत जे परीक्षेविना पास झाले आहेत.

डिसेंबर २०२० मध्ये शासनाने नववी-दहावीच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. परंतु कोरोनामुळे तो फसला. मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाची लाट इतकी उसळली की, हजारो लोकांचे जीव गेले. विदर्भातील शाळा यंदा २८ जून रोजी उघडणार आहेत. पण शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची रिस्क घेतली नाही. २८ जूनपासून शिक्षक मात्र उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही. पण शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळेने दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आरटीईचा शेरा मारला आहे.

- जिल्ह्यातील शाळा

जिल्हा परिषद - १५३०

महानगरपालिका - १५६

नगरपालिका - ६८

खासगी अनुदानित शाळा - १२०२

विना अनुदानित शाळा - ११५५

एकुण विद्यार्थी - ८,७२,६३२

- ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

कोरोनाच्या संसर्गात शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हे एकमेव माध्यम ठरू शकले. यामुळे देशातील, जगातील शिक्षक विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधू शकतात. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षण केंद्रे बंद होती. त्यामुळे मुलांना घरबसल्या शिकता आले. ऑनलाईन वर्गात शिक्षकांचा एखादा मुद्दा न समजल्यास, रेकॉर्ड केलेले लेक्चर विद्यार्थी पुन्हा पाहू शकतो. अभ्यासातील काही गोष्टी समजल्या नाही, तर गुगलवर सोप्या भाषेत शोधू शकतो.

- ऑनलाईन शिक्षणाचे तोटे

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य असते. शिक्षक नेमके काय शिकवित आहे, अनेकदा विद्यार्थ्यांना कळत नाही. ऑनलाईन शिक्षण वन-वे कम्युनिकेशन असते. मुलांचे मन विचलित होऊ शकते, शिस्तीची कमतरता असते. मागास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहे.

- ग्रामीणमध्ये ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण संसाधनांची आहे. त्याचबरोबर नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा सुद्धा मोठा त्रास आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक असो की विद्यार्थी यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये ७० टक्के विद्यार्थी गेल्या सत्रात शिक्षणापासून वंचित होते. शहरामध्ये काही नामांकित शाळेत ऑनलाईन शिक्षण झाले. पण विद्यार्थ्यांनी त्यांना किती सकारात्मक प्रतिसाद दिला. याचे मूल्यांकन होऊ शकले नाही. परीक्षा झाली असती तर ऑनलाईन शिक्षणाची सकारात्मकता दिसून आली असती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.