शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कारागृह नव्हे यातनागृह !

By admin | Updated: July 4, 2015 03:06 IST

गत १४ महिन्यापासून आपण नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो. वास्तविक हे कारागृह नसून यातनागृह आहे,

माओवादी नेता साईबाबाने जामिनावर सुटका होताच मांडली व्यथानागपूर : गत १४ महिन्यापासून आपण नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो. वास्तविक हे कारागृह नसून यातनागृह आहे, अशी व्यथा नक्षली कारवाया केल्याचा आरोप असलेल्या माओवादी नेता प्रा. जी. एन. साईबाबा याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कारागृह ही सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे, यावरही त्याने भर दिला. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या साईबाबाला वैद्यकीय उपचार घेता यावे म्हणून तीन महिन्यासाठी तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचा आदेश देताच शुक्रवारी दुपारच्या वेळी त्याला कारागृहातून सोडण्यात आले. अपंगाच्या तीन चाकी वाहनाने तो कारागृहाच्या बाहेर पडला. त्यावेळी त्याला पत्रकारांनी घेरले. त्याने पत्रकारांपुढे कारागृहात आलेला थरार अनुभवच कथित केला. तो म्हणाला, कारागृह ही सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे, ते यातनागृह नसावे. कारागृहातील यातना हेच आपल्या आजाराचे कारण होय, असेही तो म्हणाला.स्वत:चे स्वातंत्र्य आणि हक्क गमावल्यानंतर कसे वाटते, याबाबतचा अनुभव आपण स्वत: घेतला आहे. माणसाच्या जीवनात स्वातंत्र्याचे किती मूल्य आहे, याची जाणीव आपणास कारागृहातून बाहेर पडल्यानंतर झाली. कारागृह हे सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुधारणा घडवून आणणारा अधिकारी म्हणून वागले पाहिजे. कारागृहात प्रत्येकालाच यातना दिल्या जातात. त्याला मारहाण केली जाते. त्याचा अपमान केला जातो आणि अमानुषरीत्या छळ केला जातो. कारागृहात कैद्यांचा होणारा भयावह आणि अमानुष छळ आपण स्वत: आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि आजारी पडलो, असेही तो म्हणाला. म्हणूनच कारागृह हे कारागृह नसून यातनागृह आहे. या ठिकाणी मला जेवण आणि औषधही दिले जात नव्हते. हा छळाचाच प्रकार आहे. आपला शारीरिक छळ केला गेला नाही, हे मात्र त्याने मान्य केले. माओवाद्यांशी संबंध असल्यावरून गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला नवी दिल्लीच्या विद्यापीठासमोरून अटक केली होती. त्यानंतर त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. १४ महिन्यापासून तो कारागृहात बंदिस्त होता. (प्रतिनिधी)