शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

कारागृह नव्हे यातनागृह !

By admin | Updated: July 4, 2015 03:06 IST

गत १४ महिन्यापासून आपण नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो. वास्तविक हे कारागृह नसून यातनागृह आहे,

माओवादी नेता साईबाबाने जामिनावर सुटका होताच मांडली व्यथानागपूर : गत १४ महिन्यापासून आपण नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो. वास्तविक हे कारागृह नसून यातनागृह आहे, अशी व्यथा नक्षली कारवाया केल्याचा आरोप असलेल्या माओवादी नेता प्रा. जी. एन. साईबाबा याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कारागृह ही सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे, यावरही त्याने भर दिला. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या साईबाबाला वैद्यकीय उपचार घेता यावे म्हणून तीन महिन्यासाठी तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचा आदेश देताच शुक्रवारी दुपारच्या वेळी त्याला कारागृहातून सोडण्यात आले. अपंगाच्या तीन चाकी वाहनाने तो कारागृहाच्या बाहेर पडला. त्यावेळी त्याला पत्रकारांनी घेरले. त्याने पत्रकारांपुढे कारागृहात आलेला थरार अनुभवच कथित केला. तो म्हणाला, कारागृह ही सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे, ते यातनागृह नसावे. कारागृहातील यातना हेच आपल्या आजाराचे कारण होय, असेही तो म्हणाला.स्वत:चे स्वातंत्र्य आणि हक्क गमावल्यानंतर कसे वाटते, याबाबतचा अनुभव आपण स्वत: घेतला आहे. माणसाच्या जीवनात स्वातंत्र्याचे किती मूल्य आहे, याची जाणीव आपणास कारागृहातून बाहेर पडल्यानंतर झाली. कारागृह हे सुधारणा घडवून आणणारी संस्था असली पाहिजे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुधारणा घडवून आणणारा अधिकारी म्हणून वागले पाहिजे. कारागृहात प्रत्येकालाच यातना दिल्या जातात. त्याला मारहाण केली जाते. त्याचा अपमान केला जातो आणि अमानुषरीत्या छळ केला जातो. कारागृहात कैद्यांचा होणारा भयावह आणि अमानुष छळ आपण स्वत: आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि आजारी पडलो, असेही तो म्हणाला. म्हणूनच कारागृह हे कारागृह नसून यातनागृह आहे. या ठिकाणी मला जेवण आणि औषधही दिले जात नव्हते. हा छळाचाच प्रकार आहे. आपला शारीरिक छळ केला गेला नाही, हे मात्र त्याने मान्य केले. माओवाद्यांशी संबंध असल्यावरून गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला नवी दिल्लीच्या विद्यापीठासमोरून अटक केली होती. त्यानंतर त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. १४ महिन्यापासून तो कारागृहात बंदिस्त होता. (प्रतिनिधी)