शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

सराव नाही, उजळणी नाही; संभ्रम, आत्मविश्वासही हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:30 IST

Nagpur news ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.

ठळक मुद्देलिखाणाचा सराव सुटला, बैठकीची सुटली सवयविद्यार्थ्यांपुढे आता अडचणींची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न देता नववीतून दहावीत व अकरावीतून बारावीत ढकलले. अख्खे सत्र विना शिक्षणाचे आटोपले आणि आता तोंडावर परीक्षा आल्या. त्यातही आता साडेतीन तास पेपर सोडवायचा आहे. लिखाणाचा सराव राहिलेला नाही. ११.३० ते ५.३० शाळेतील बैठकीची सवय सुटली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा बंद असल्याने सराव परीक्षा नाही, त्यामुळे उजळणी झाली नाही. ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.

दहावी आणि बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे सत्र साधारणत: मे महिन्यापासून सुरू होते. कोरोनामुळे जूनपर्यंत हालचालीच झाल्या नाही. जून महिन्यानंतर शहरातील काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामीण भागात दिवाळीपर्यंत ऑनलाईनचा गंधही दिसून आला नाही. दिवाळीनंतर काही शाळांना जाग आली खरी, पण ऑनलाईनच्या अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावल्या. ग्रामीण भागात तर ८० टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यासच झाला नाही.

शिक्षणाचे मूळ सूत्र वाचन, लेखन आणि पठण आहे. ऑनलाईनमध्ये ते झालेच नाही. विज्ञान, गणितसारखे विषय शिक्षकांनी शिकविले, पण विद्यार्थ्यांना ते रुचलेच नाही. होमवर्क दिला पण तो तपासल्याच गेला नाही. रिचार्जच्या अडचणी, नेटवर्कची कनेक्टीव्हीटी याची डोकेदुखी कायमच राहिली. विद्यार्थी शिक्षकांपासून तुटला, त्यामुळे अभ्यास करवून घेण्याची सवयही सुटली. शिक्षणातील या सर्व मूलभूत गोष्टी सुटल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला आहे.

- या आहेत अडचणी

१) शहरात ४० टक्के तर ग्रामीणमध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले.

२) अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही.

३) सराव परीक्षा झाल्या नसल्याने उजळणी झाली नाही.

४) लेखनाचा, बसण्याचा सराव नाही.

५) परीक्षेची तयारीच झाली नसल्याने आत्मविश्वास हरविला.

६) शिक्षण ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन असल्याने पेपर पॅटर्न कळला नाही.

७) ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही.

८) कोरोनामुळे नववीतून जसे दहावीत गेलो तसे दहावीतून अकरावीत जाऊ, अशी झाली विद्यार्थ्यांची मानसिकता.

९) अनेक विद्यार्थ्यांची ड्रॉपला पसंती.

- यंदा परीक्षा ही केवळ एक फॉर्मालिटी आहे. ग्रामीण भागातील ६० टक्के विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही. अभ्यास काय करावा, याचेही भान नाही. परीक्षेचा वेळ वाढविण्यापेक्षा किती अभ्यास झाला, याकडे लक्ष देण्याची गरज होती. मुलांच्या डोक्यात जसे नववीतून दहावीत गेलो, तसे दहावीतून अकरावीत जाऊ हे फिट आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य

- यावर्षी मुलांचे अभ्यासाचे ज्ञान शून्य आहे. परीक्षेला बसविणे एक खानापूर्ती आहे.

डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- आता प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे.

३० दिवस आता उरले आहेत. ऑनलाईनमध्ये काहीच कळले नाही. किमान या ३० दिवसात मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

राहुल गौर, प्राध्यापक

टॅग्स :examपरीक्षा