शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सराव नाही, उजळणी नाही; संभ्रम, आत्मविश्वासही हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:30 IST

Nagpur news ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.

ठळक मुद्देलिखाणाचा सराव सुटला, बैठकीची सुटली सवयविद्यार्थ्यांपुढे आता अडचणींची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न देता नववीतून दहावीत व अकरावीतून बारावीत ढकलले. अख्खे सत्र विना शिक्षणाचे आटोपले आणि आता तोंडावर परीक्षा आल्या. त्यातही आता साडेतीन तास पेपर सोडवायचा आहे. लिखाणाचा सराव राहिलेला नाही. ११.३० ते ५.३० शाळेतील बैठकीची सवय सुटली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा बंद असल्याने सराव परीक्षा नाही, त्यामुळे उजळणी झाली नाही. ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.

दहावी आणि बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे सत्र साधारणत: मे महिन्यापासून सुरू होते. कोरोनामुळे जूनपर्यंत हालचालीच झाल्या नाही. जून महिन्यानंतर शहरातील काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामीण भागात दिवाळीपर्यंत ऑनलाईनचा गंधही दिसून आला नाही. दिवाळीनंतर काही शाळांना जाग आली खरी, पण ऑनलाईनच्या अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावल्या. ग्रामीण भागात तर ८० टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यासच झाला नाही.

शिक्षणाचे मूळ सूत्र वाचन, लेखन आणि पठण आहे. ऑनलाईनमध्ये ते झालेच नाही. विज्ञान, गणितसारखे विषय शिक्षकांनी शिकविले, पण विद्यार्थ्यांना ते रुचलेच नाही. होमवर्क दिला पण तो तपासल्याच गेला नाही. रिचार्जच्या अडचणी, नेटवर्कची कनेक्टीव्हीटी याची डोकेदुखी कायमच राहिली. विद्यार्थी शिक्षकांपासून तुटला, त्यामुळे अभ्यास करवून घेण्याची सवयही सुटली. शिक्षणातील या सर्व मूलभूत गोष्टी सुटल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला आहे.

- या आहेत अडचणी

१) शहरात ४० टक्के तर ग्रामीणमध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले.

२) अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही.

३) सराव परीक्षा झाल्या नसल्याने उजळणी झाली नाही.

४) लेखनाचा, बसण्याचा सराव नाही.

५) परीक्षेची तयारीच झाली नसल्याने आत्मविश्वास हरविला.

६) शिक्षण ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन असल्याने पेपर पॅटर्न कळला नाही.

७) ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही.

८) कोरोनामुळे नववीतून जसे दहावीत गेलो तसे दहावीतून अकरावीत जाऊ, अशी झाली विद्यार्थ्यांची मानसिकता.

९) अनेक विद्यार्थ्यांची ड्रॉपला पसंती.

- यंदा परीक्षा ही केवळ एक फॉर्मालिटी आहे. ग्रामीण भागातील ६० टक्के विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही. अभ्यास काय करावा, याचेही भान नाही. परीक्षेचा वेळ वाढविण्यापेक्षा किती अभ्यास झाला, याकडे लक्ष देण्याची गरज होती. मुलांच्या डोक्यात जसे नववीतून दहावीत गेलो, तसे दहावीतून अकरावीत जाऊ हे फिट आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य

- यावर्षी मुलांचे अभ्यासाचे ज्ञान शून्य आहे. परीक्षेला बसविणे एक खानापूर्ती आहे.

डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- आता प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे.

३० दिवस आता उरले आहेत. ऑनलाईनमध्ये काहीच कळले नाही. किमान या ३० दिवसात मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

राहुल गौर, प्राध्यापक

टॅग्स :examपरीक्षा