शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सराव नाही, उजळणी नाही; संभ्रम, आत्मविश्वासही हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:30 IST

Nagpur news ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.

ठळक मुद्देलिखाणाचा सराव सुटला, बैठकीची सुटली सवयविद्यार्थ्यांपुढे आता अडचणींची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न देता नववीतून दहावीत व अकरावीतून बारावीत ढकलले. अख्खे सत्र विना शिक्षणाचे आटोपले आणि आता तोंडावर परीक्षा आल्या. त्यातही आता साडेतीन तास पेपर सोडवायचा आहे. लिखाणाचा सराव राहिलेला नाही. ११.३० ते ५.३० शाळेतील बैठकीची सवय सुटली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा बंद असल्याने सराव परीक्षा नाही, त्यामुळे उजळणी झाली नाही. ७५ टक्के अभ्यास केला पण कोणता, याची माहिती विद्यार्थ्यांना नाही. अभ्यास पूर्ण न झाल्याने आत्मविश्वास हरविला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपुढे या अडचणीच परीक्षा ठरत आहे.

दहावी आणि बारावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे सत्र साधारणत: मे महिन्यापासून सुरू होते. कोरोनामुळे जूनपर्यंत हालचालीच झाल्या नाही. जून महिन्यानंतर शहरातील काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामीण भागात दिवाळीपर्यंत ऑनलाईनचा गंधही दिसून आला नाही. दिवाळीनंतर काही शाळांना जाग आली खरी, पण ऑनलाईनच्या अडचणी मोठ्या प्रमाणात भेडसावल्या. ग्रामीण भागात तर ८० टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यासच झाला नाही.

शिक्षणाचे मूळ सूत्र वाचन, लेखन आणि पठण आहे. ऑनलाईनमध्ये ते झालेच नाही. विज्ञान, गणितसारखे विषय शिक्षकांनी शिकविले, पण विद्यार्थ्यांना ते रुचलेच नाही. होमवर्क दिला पण तो तपासल्याच गेला नाही. रिचार्जच्या अडचणी, नेटवर्कची कनेक्टीव्हीटी याची डोकेदुखी कायमच राहिली. विद्यार्थी शिक्षकांपासून तुटला, त्यामुळे अभ्यास करवून घेण्याची सवयही सुटली. शिक्षणातील या सर्व मूलभूत गोष्टी सुटल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला आहे.

- या आहेत अडचणी

१) शहरात ४० टक्के तर ग्रामीणमध्ये २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतले.

२) अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही.

३) सराव परीक्षा झाल्या नसल्याने उजळणी झाली नाही.

४) लेखनाचा, बसण्याचा सराव नाही.

५) परीक्षेची तयारीच झाली नसल्याने आत्मविश्वास हरविला.

६) शिक्षण ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन असल्याने पेपर पॅटर्न कळला नाही.

७) ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही.

८) कोरोनामुळे नववीतून जसे दहावीत गेलो तसे दहावीतून अकरावीत जाऊ, अशी झाली विद्यार्थ्यांची मानसिकता.

९) अनेक विद्यार्थ्यांची ड्रॉपला पसंती.

- यंदा परीक्षा ही केवळ एक फॉर्मालिटी आहे. ग्रामीण भागातील ६० टक्के विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडली नाही. अभ्यास काय करावा, याचेही भान नाही. परीक्षेचा वेळ वाढविण्यापेक्षा किती अभ्यास झाला, याकडे लक्ष देण्याची गरज होती. मुलांच्या डोक्यात जसे नववीतून दहावीत गेलो, तसे दहावीतून अकरावीत जाऊ हे फिट आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य

- यावर्षी मुलांचे अभ्यासाचे ज्ञान शून्य आहे. परीक्षेला बसविणे एक खानापूर्ती आहे.

डॉ. अशोक गव्हाणकर, प्राचार्य

- आता प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे.

३० दिवस आता उरले आहेत. ऑनलाईनमध्ये काहीच कळले नाही. किमान या ३० दिवसात मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

राहुल गौर, प्राध्यापक

टॅग्स :examपरीक्षा