शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:09 IST

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदीप जोशी लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. यामुळेच ते शहरातील प्रमुख बाजार भागात दौरा करून नागरिक व व्यापाऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदीप जोशी लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. यामुळेच ते शहरातील प्रमुख बाजार भागात दौरा करून नागरिक व व्यापाऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी आतापर्यंत इतवारी, महाल, खामला, देवनगर येथील प्रमुख बाजारांची पाहणी केली. मंगळवारी गोकुळपेठ बाजाराचा दौरा करून नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे समर्थन त्यांनी केले. काही दुकानदार व नागरिक बेजबाबदार वागत असल्याचे निदर्शनास आले. मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपकडून महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे पाच हजार रुपये दंड वसूल केला.बाजारातील परिस्थिती व लॉकडाऊनची आवश्यकता यासंदर्भात लोकमतने महापौर संदीप जोशी यांच्याशी चर्चा केली. जोशी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागायला नको. आधीच गरीब व मध्यमवर्गीय लोकांची कंबर मोडली आहे. लॉकडाऊन कालावधीत दररोज अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. लोकांचे दु:ख जाणतो. कोविडवर अंकुश ठेवायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रशासनाला यासंदर्भात सतर्कता दाखवावी लागेल. शिस्तीत नियमांचे पालन केले तर तसेही आपण कोविड संक्रमणाला रोखू शकतो.शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केला तर शहरातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येईल. आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून नियमांचे कठोरतेने पालन करावे, अशी मागणी करणार असल्याचे संदीप जोशी म्हणाले. बाजारात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दुचाकीवर दोन वा तीन जण फिरत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर करवाई करावी. गरज भासल्यास बळाचा वापर करावा.लॉकडाऊनमुळे व्यापारीही अडचणीत आहेत. त्यांना दुकान उघडण्याची घाई आहे. असे असले तरी संक्रमण रोखण्यासाठी सम-विषम दिवसाला दुकान सुरू ठेवावे. नियमांचे पालन करावे, असेही महापौरांनी सांगितले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMarketबाजार