शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

लॉकडाऊनची गरज नाही, नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:09 IST

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदीप जोशी लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. यामुळेच ते शहरातील प्रमुख बाजार भागात दौरा करून नागरिक व व्यापाऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदीप जोशी लॉकडाऊनच्या बाजूने नाहीत. यामुळेच ते शहरातील प्रमुख बाजार भागात दौरा करून नागरिक व व्यापाऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांनी आतापर्यंत इतवारी, महाल, खामला, देवनगर येथील प्रमुख बाजारांची पाहणी केली. मंगळवारी गोकुळपेठ बाजाराचा दौरा करून नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे समर्थन त्यांनी केले. काही दुकानदार व नागरिक बेजबाबदार वागत असल्याचे निदर्शनास आले. मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपकडून महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे पाच हजार रुपये दंड वसूल केला.बाजारातील परिस्थिती व लॉकडाऊनची आवश्यकता यासंदर्भात लोकमतने महापौर संदीप जोशी यांच्याशी चर्चा केली. जोशी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शहरात पुन्हा लॉकडाऊन लागायला नको. आधीच गरीब व मध्यमवर्गीय लोकांची कंबर मोडली आहे. लॉकडाऊन कालावधीत दररोज अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. लोकांचे दु:ख जाणतो. कोविडवर अंकुश ठेवायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रशासनाला यासंदर्भात सतर्कता दाखवावी लागेल. शिस्तीत नियमांचे पालन केले तर तसेही आपण कोविड संक्रमणाला रोखू शकतो.शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केला तर शहरातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ येईल. आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून नियमांचे कठोरतेने पालन करावे, अशी मागणी करणार असल्याचे संदीप जोशी म्हणाले. बाजारात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दुचाकीवर दोन वा तीन जण फिरत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कठोर करवाई करावी. गरज भासल्यास बळाचा वापर करावा.लॉकडाऊनमुळे व्यापारीही अडचणीत आहेत. त्यांना दुकान उघडण्याची घाई आहे. असे असले तरी संक्रमण रोखण्यासाठी सम-विषम दिवसाला दुकान सुरू ठेवावे. नियमांचे पालन करावे, असेही महापौरांनी सांगितले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMarketबाजार