शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

नागपुरात लॉकडाऊन नाही, रात्रीचीच जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगर व पोलीस आयुक्तालय परिसरात ३१ मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री ८ नंतरची जमावबंदी सुरू राहील. मात्र, अन्य कुठलेही स्थानिक निर्बंध यापुढे राहणार नाहीत. म्हणजेच नागपुरात पूर्णत: लॉकडाऊन राहणार नाही, असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशांचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी यावेळी केली.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पालकमंत्री राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खा. डॉ. विकास महात्मे, आ. गिरीश व्यास, आ. अभिजित वंजारी, आ. विकास कुंभारे, आ. ॲड. आशिष जयस्वाल, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. राजू पारवे, प्रवीण दटके आदी लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका अपर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा अर्चना कोठारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपुरात ३१ मार्चपर्यंत निर्बंध लावण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात आणखी कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. सुरुवातीच्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन कुणालाच नको होते. व्यापारी संघटना, मजूर कामगार आदींच्या संघटनांसह नागरिकांनीही याला विराेध होता. लॉकडाऊनमध्ये गरिबांचेच सर्वाधिक हाल होतात. हा अनुभव असल्याने ‘लोकमत’ने सुद्धा लॉकडाऊनला विरोध दर्शवित विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. याबाबत सातत्याने पाठपुरावाही केला. एकूणच नागरिकांची भूमिका आणि ‘लोकमत’चा पाठपुराव्याला अखेर यश आले. प्रशासनाने या सर्वांची गंभीर दखल घेत लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला; परंतु लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालना करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. म्हणजेच रात्रीची जमाववबंदी ही काटोकोरपणे राबविली जाणार आहे. यासोबतच लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. प्रशासनाने निर्बंध हटवले. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यांनी स्वत:च कोरोना नियमांचे पालन करून स्वत:सह इतरांनाही संक्रमणापासून वाचविण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.

असेही निर्देश

-नागरिकांनी आरटीपीसीआर तपासणी करावी

-आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

-बेडची संख्या वाढवावी-

गृहविलगीकरणातील रुग्णांनी विशेष दक्षता घ्यावी

बेडच्या उपलब्धतेसंदर्भात समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नागरिकांनाही बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती द्यावी

लसीकरण केंद्र वाढवण्यात यावी

होमक्वारंटाईन रुग्णांसाठी कडक निर्बंध लागू करा

कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारन्टाईन असताना बाहेर फिरत असल्याच्या तक्रारींबाबत राऊत म्हणाले की, अशा रुग्णांसाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने संहिता तयार करावी व त्यानुसार कडक निर्बंध लागू करावे. रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यासाठी बेड मॅनेजमेंट, ऑक्सिजनचा पुरवठा तसेच रेमडिसिवर या औषधाची उपलब्धता यावर विशेष लक्ष केंद्रित करा. कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईक यांचा संवाद तसेच आहार व्यवस्था चोख ठेवावी. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथील नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भातील उपचाराबाबत प्रोटोकॉल तयार करावा व त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत.

विशेष नोडल अधिकारी नियुक्त

कोरोनासंदर्भातील तपासणी, लसीकरण आदींबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या औषधोपचार आदींबाबत नियंत्रणासाठी विशेष नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात येणार असून ग्रामीण भागासाठी संबंधित तहसीलदार तर शहरासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

तपासणी व लसीकरण वाढविण्यासाठी आराखडा तयार करा - गृहमंत्री देशमुख

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये काटोल, नरखेड, सावनेर,कामठी, हिंगणा आदी क्षेत्रांत तपासण्यांचे प्रमाण व लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या.

जिल्ह्यात ३,५९,९५३ जणांचे लसीकरण - संजीव कुमार

मुंबई, ठाणे, पुणे यानंतर नागपूरमध्ये लसीकरण चांगले झाले, असून जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार ९५३ लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढवून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी यावेळी दिली.

लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर : राधाकृष्णन बी.

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर विशेष भर देण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रांवर दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले.