शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७८४ शाळेत इंटरनेटच नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनदेखील नाही : कसे होणार ऑनलाइन शिक्षण ? नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण ...

विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनदेखील नाही : कसे होणार ऑनलाइन शिक्षण ?

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, असा आभासी दावा शिक्षण विभाग करीत आहे. पण जिल्ह्यातील २६२० शाळांपैकी ७८४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची सूत्रांची माहिती आहे. इंटरनेटची सुविधाच नसली तर ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळा बंद शिक्षण सुरू, या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे. खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पाल्याकडे स्मार्टफोन नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांची इंटरनेट रिचार्ज करण्याची परिस्थिती नाही. असे असतानाही ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. काही शाळेत इंटरनेट सुविधा नसली तरी, शिक्षक आपल्या मोबाइलद्वारे झूम अ‍ॅप, गुगल मीटद्वारे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहे.

-दृष्टिक्षेपात-

जिल्ह्यातील एकूण शाळा - २६२०

इंटरनेट असलेल्या शाळा - १८३६

इंटरनेट नसलेल्या शाळा - ७८४

जिल्हा परिषदेच्या शाळा - १५३०

अनुदानित शाळा - ६५८

विनाअनुदानित शाळा - ४३२

- शिक्षकांच्या मोबाइलचा आधार

शाळेत इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वत:च्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते. शाळेत इंटरनेट असले तरी, ज्या वेळेत शाळा भरते त्यावेळी ग्रामीण भागातील मुलांच्या हातात मोबाइलच नसतो. त्यांचे पालक मोबाइल घेऊन जातात. त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या घरूनच पालकांच्या सोयीनुसार सकाळी अथवा सायंकाळी मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते.

- काय म्हणतात शिक्षक

- मोबाइलद्वारे आकृती, प्रतिकृती शिकविणे अवघड आहे. गणितासारखा विषय मोबाइलवर समजावून सांगणे अवघड आहे. पण पर्याय नाही. शाळेत इंटरनेट असणे किंवा नसणे त्याचा ऑनलाइन शिक्षणाशी संबंध नाही. मुळात मुलांजवळ ती सोय साधने असायला हवी.

- राजेश ठाकरे, शिक्षक

खरे तर ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही. शाळेत जाऊन बसणे, तिथून ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना शिकविणे यातून फारसे काही साध्य होत नाही. खरे तर विद्यार्थी शाळेत यायला हवेत, प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन व्हायला हवे.

- सुनील लांजेवार, शिक्षक

शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण सुरू आहे

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहे. शासनाकडून शिक्षण सुरू करण्यासंदर्भात वेळोवेळी दिशानिर्देश येतात. त्यानुसार शिक्षकांना सूचना देण्यात येतात. जिल्ह्यात ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.