शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

तकीया धंतोलीत विकास पोहोचलाच नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:09 IST

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तकीया धंतोली या वस्तीतील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. येथील नागरिकांना रस्ते, ...

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तकीया धंतोली या वस्तीतील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. येथील नागरिकांना रस्ते, पाणी, गटार लाइनच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने या भागातील समस्या सोडविण्याची मागणी ते करीत आहेत.

पाण्यासाठी होते नागरिकांची भटकंती

तकीया धंतोली परिसरात नळलाइन आहे. परंतु या लाइनवरून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नळाला नियमित पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना केवळ पिण्याचे पाणी मिळते. वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. याभागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागात पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

गटारलाइन, कचऱ्याची समस्या

या भागातील गटारमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गटार वारंवार चोकअप होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नागरिकांनी अनेकदा याबाबत महापालिकेकडे निवेदन दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गटार लाइन चोकअप झाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहते. पावसाळ्यात हे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या भागातील गटारची नियमित देखभाल करण्याची गरज आहे. यासोबतच वस्तीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या भागात सार्वजनिक ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. हा कचरा उचलण्यासाठी कोणीच येत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था महापालिकेने करण्याची गरज आहे.

ग्रंथालय, उद्यानाची गरज

तकीया धंतोली परिसरात ग्रंथालय होते; परंतु मागील काही वर्षांपासून हे ग्रंथालय बंद झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्थळच उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिकेने हे ग्रंथालय सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नसल्यामुळे लहान मुले रस्त्यावर खेळतात. त्यांचा अपघात होण्याची भीती असून, या भागात उद्यान सुरू करण्याची आवश्यकता आहे.

उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा

‘कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.’

-मंगेश सोनवाणे, नागरिक

गटार लाइनची देखभाल करावी

‘तकीया धंतोली परिसरात नेहमीच गटार चोकअप होते. त्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहून दुर्गंधी पसरते. महापालिकेने गटारची नियमित देखभाल करण्याची गरज आहे.’

-दिनेश सिडाम

कूपनलिका दुरुस्त कराव्या

‘नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना कूपनलिकेचा आधार वाटतो. परंतु या भागातील बहुतांश कूपनलिका बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी या भागातील कूपनलिका सुरू करण्याची मागणी आहे.’

-किशोर निखाडे, नागरिक

कचरा नियमित उचलावा

‘नागरिक रिकाम्या जागी कचरा आणून टाकतात. हा कचरा नियमित उचलण्यात येत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. महापालिकेने हा कचरा नियमित उचलण्याची व्यवस्था करावी.’

-अरुण नेवारे, नागरिक

ग्रंथालय सुरू करावे

‘तकीया धंतोली भागातील सार्वजनिक ग्रंथालय मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महापालिकेने हे ग्रंथालय सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-मंगला हंसा, रहिवासी

उद्यान सुरू करावे

‘लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे महापालिकेने या भागात उद्यान सुरू करण्याची मागणी आहे.’

-संगीता बागडे, रहिवासी

............