शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तकीया धंतोलीत विकास पोहोचलाच नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:09 IST

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तकीया धंतोली या वस्तीतील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. येथील नागरिकांना रस्ते, ...

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तकीया धंतोली या वस्तीतील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. येथील नागरिकांना रस्ते, पाणी, गटार लाइनच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेने या भागातील समस्या सोडविण्याची मागणी ते करीत आहेत.

पाण्यासाठी होते नागरिकांची भटकंती

तकीया धंतोली परिसरात नळलाइन आहे. परंतु या लाइनवरून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नळाला नियमित पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना केवळ पिण्याचे पाणी मिळते. वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. याभागातील कूपनलिकाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागात पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

गटारलाइन, कचऱ्याची समस्या

या भागातील गटारमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गटार वारंवार चोकअप होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नागरिकांनी अनेकदा याबाबत महापालिकेकडे निवेदन दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गटार लाइन चोकअप झाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहते. पावसाळ्यात हे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या भागातील गटारची नियमित देखभाल करण्याची गरज आहे. यासोबतच वस्तीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. या भागात सार्वजनिक ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. हा कचरा उचलण्यासाठी कोणीच येत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था महापालिकेने करण्याची गरज आहे.

ग्रंथालय, उद्यानाची गरज

तकीया धंतोली परिसरात ग्रंथालय होते; परंतु मागील काही वर्षांपासून हे ग्रंथालय बंद झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्थळच उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिकेने हे ग्रंथालय सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नसल्यामुळे लहान मुले रस्त्यावर खेळतात. त्यांचा अपघात होण्याची भीती असून, या भागात उद्यान सुरू करण्याची आवश्यकता आहे.

उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा

‘कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. त्यामुळे उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.’

-मंगेश सोनवाणे, नागरिक

गटार लाइनची देखभाल करावी

‘तकीया धंतोली परिसरात नेहमीच गटार चोकअप होते. त्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहून दुर्गंधी पसरते. महापालिकेने गटारची नियमित देखभाल करण्याची गरज आहे.’

-दिनेश सिडाम

कूपनलिका दुरुस्त कराव्या

‘नळाला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना कूपनलिकेचा आधार वाटतो. परंतु या भागातील बहुतांश कूपनलिका बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी या भागातील कूपनलिका सुरू करण्याची मागणी आहे.’

-किशोर निखाडे, नागरिक

कचरा नियमित उचलावा

‘नागरिक रिकाम्या जागी कचरा आणून टाकतात. हा कचरा नियमित उचलण्यात येत नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. महापालिकेने हा कचरा नियमित उचलण्याची व्यवस्था करावी.’

-अरुण नेवारे, नागरिक

ग्रंथालय सुरू करावे

‘तकीया धंतोली भागातील सार्वजनिक ग्रंथालय मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महापालिकेने हे ग्रंथालय सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-मंगला हंसा, रहिवासी

उद्यान सुरू करावे

‘लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते. मुले रस्त्यावर खेळत असल्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे महापालिकेने या भागात उद्यान सुरू करण्याची मागणी आहे.’

-संगीता बागडे, रहिवासी

............