शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

९ महिन्यांनंतरही विदर्भ विकास मंडळावर निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भासह राज्यातील तिन्ही विकास मंडळांचा कार्यकाळ संपून ९ महिन्यांपेक्षा अधिक काळ लाेटला आहे. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भासह राज्यातील तिन्ही विकास मंडळांचा कार्यकाळ संपून ९ महिन्यांपेक्षा अधिक काळ लाेटला आहे. परंतु अजूनही कार्यकाळ विस्ताराबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. विदर्भ विकास मंडळाचे कार्यालय सुरू आहे. परंतु कुठलीही नवीन जबाबदारी मिळाली नसल्याने अधिकारी-कर्मचारी चिंतित आहेत.

राष्ट्रपतींच्या आदेशानुसार राज्यातील प्रादेशिक संतुलन कायम ठेवण्यासाठी १९९४ मध्ये विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. संविधानाच्या कलम ३७१ (२) अंतर्गत या निर्णयामुळे राज्यपालांना विशेषाधिकार मिळालेले होते. एप्रिल २०१५ मध्ये मागच्या आदेशानुसार या विकास मंडळांना ३० एप्रिल २०२० पर्यंत विस्तार मिळालेला होता. परंतु या वर्षी मंडळाच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. नियमानुसार राज्य मंत्रिमंडळाला राज्यपालांकडे मुदतवाढीसाठी शिफारस करायची आहे. राज्यपाल ही शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवतात. त्यांच्या मंजुरीनंतर राष्ट्रपती मुदतवाढीचे आदेश जारी करतात. परंतु राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन वेळा यावर चर्चा होऊनही कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. यादरम्यान महाराष्ट्र व कोकणसाठीसुद्धा विकास मंडळ स्थापन करण्याची मागणी होऊ लागली. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, या विकास मंडळांना अधिक सशक्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

३० एप्रिल २०२० पासून विकास मंडळ अस्तित्वहीन झाले आहे. कुठलेही नवीन काम नसल्याने विशेष निधी वितरणाची केवळ तपासणी केली जात आहे.

बॉक्स

अनुशेष कायम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातर्फे या वर्षी जारी केलेल्या दिशा-निर्देशानुसार अजूनही विदर्भात सिंचनाचा अनुशेष कायम आहे. विदर्भातील अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात १,६३,१३९ हेक्टर सिंचनाचा अनुशेष आहे. दुसरीकडे विदर्भवादी भौतिक अनुशेषासह आर्थिक अनुशेषाचा विचार करून ते दूर करण्याची मागणी करीत आहेत.

बॉक्स

जुनी कामे पूर्ण केली जात आहेत

विकास मंडळाच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीबाबत राज्य मंत्रिमंडळाला निर्णय घ्यायचा आहे. यासंदर्भात मी काही बोलू शकत नाही. सध्या मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या जिल्ह्यांना देण्यात आलेल्या विशेष निधीतून झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला जात आहे.

- मनीषा खत्री, सदस्य सचिव, विदर्भ विकास मंडळ