शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

डीबीटी नको, जेवण द्या! आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:33 IST

डीबीटी योजना विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याने आदिवासी विभागातील योजना रद्द करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघासह विविध संघटनांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारे भोजन, स्टेशनरी, बेडिंग साहित्य तसेच आश्रम शाळेतील शैक्षणिक साहित्य यासाठी सरकारने दोन वर्षापूर्वी डीबीटी लागू केली होती. ही योजना विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरत असल्याने आदिवासी विभागातील डीबीटी योजना रद्द करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघासह विविध संघटनांनी केली आहे.एप्रिल २०१८ पर्यंत शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना सरकारी यंत्रणेद्वारे भोजन पुरवठा करण्यात येत होता. आता डीबीटीमुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात सरळ पैसे जमा होत असले तरी, त्याचा उपयोग शिक्षणासाठी होत नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. वसतिगृहात सरकारी यंत्रणेद्वारे खाणावळ सुरू केल्यास विद्यार्थ्यांची जेवणासाठी भटकंती दूर होईल.भाजपा सरकारने ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांवर लादली होती. ही योजना विद्यार्थ्यांच्या फायद्याची होती, तर सामाजिक न्याय खात्याला का लागू करण्यात आली नाही, असा सवाल आता आदिवासी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. डीबीटी रद्द व्हावी म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने केली. मंत्र्यांना निवेदन दिले. पुणे-नाशिक असा लाँगमार्च काढला. परंतु भाजपाच्या सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आदिवासी विभागातील डीबीटी योजना रद्द करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष मुकेश नेताम यांनी आदिवासी मंत्र्यांकडे केली आहे.आदिवासी मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचे हे कारस्थान आहे.विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला नाही. मग रद्द करताना आयुक्त, अपर आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांचे मत मागविण्याचे काय कारण? विचारायचेच असल्यास आदिवासी विद्यार्थी संघ व विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांचे म्हणणे ऐकून घ्यावे.दिनेश बाबूराव मडावी, संयोजक, अ.भा. आदिवासी विकास, परिषद

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र