शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

अधिकाऱ्यांना नाही परिपत्रकाचा पत्ता

By admin | Updated: February 5, 2015 01:15 IST

नागपुरात सध्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंबंधात राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी पुढाकार घेत ‘वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांसाठी

समन्वयाचा अभाव : वारांगनांचे प्रशिक्षण रखडलेआनंद डेकाटे - नागपूरनागपुरात सध्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंबंधात राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी पुढाकार घेत ‘वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची विशेष योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. इतकेच नव्हे तर शासकीय परिपत्रक काढून मनपा व जि.प.च्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना राबविण्याच्या सूचना सुद्धा केल्या होत्या. मात्र, संबंधित विभागांना शासनाने तीन वर्षांपूर्वी काढलेल्या या परिपत्रकाची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ‘बुद्धदेव करमकर विरुद्ध पश्चिम बंगाल शासन’ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी २०११ रोजी सर्व राज्यांमध्ये वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी व त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी विशेष योजना राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या ेसूचनेनुसार शासनाने ‘वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची विशेष योजना’ राबविण्याचा निर्णय घेत महिला व बाल विकास आयुक्तालयाला १ जुलै २०११ रोजी शासन परिपत्रक काढण्याबाबत पत्र लिहिले. त्या पत्राच्या आधारावर १९ जुलै २०११ रोजी परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकानुसार वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील नामांकित संस्थांची माहिती घेऊन सदर संस्थांना योजना राबविण्यासाठी उद्युक्त करावयाचे होते. याकरिता अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत स्थापित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीतसुद्धा या विषयाबाबत चर्चा करून ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना शासनातर्फे करण्यात आल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अशासकीय मंडळ, जिल्ह्यातील समुपदेशक, व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लाल बत्ती विभागात कार्य करणाऱ्या संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने आयोजित करण्यासाठी जि.प. व महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ही योजना राबविण्यात येणार होती.