शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एटीकेटी’ची परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून घेतली तर आत्महत्या करू, अशी विद्यार्थ्यांनी धमकी दिल्यानंतर राष्ट्रसंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘एटीकेटी’ची परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून घेतली तर आत्महत्या करू, अशी विद्यार्थ्यांनी धमकी दिल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात खळबळ उडाली होती. अशा प्रकारे थेट आत्महत्येची धमकी देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाने कारवाई केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थी संघटनेकडून यासंदर्भात विद्यार्थ्यांना भडकविण्यात आले. संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे पाऊल का उचलण्यात आलेले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्रातील परीक्षा बाकी आहेत. ‘एटीकेटी’च्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन आणि ‘मिक्स मोड’ अशा तीन प्रकारात घेण्यात येणार आहेत. मात्र विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ ‘ऑफलाईन’ माध्यमातून परीक्षा होतील, असा अपप्रचार केला व विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी देणारे ‘एसएमएस’ पाठवावे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे ‘एसएमएस’ पाठविले. मुळात परीक्षा कशा पद्धतीने होईल, याचा निर्णय प्राधिकरण व प्रशासन यांचा असतो. त्यांच्यावर अशा पद्धतीने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विद्यापीठानेदेखील ही बाब गंभीरतेने घेतली नाही. भविष्यात खरोखर अशा प्रकारे एखादी दुर्घटना घडली तर त्यानंतर विद्यापीठावर दोषारोप होऊ शकतात. असे असतानादेखील विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी याची साधी माहिती पोलिसांना देण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याची भीती विद्यापीठातीलच एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केली.

१५ जानेवारीअगोदर आटोपणार ‘एटीकेटी’च्या परीक्षा

यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी या मुद्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु विद्यार्थ्यांची ‘एटीकेटी’ची परीक्षा केवळ ‘ऑफलाईन’ नव्हे तर ‘ऑनलाईन’ व ‘मिक्स मोड’मध्येदेखील होणार असल्याचे सांगितले. ९ किंवा १५ जानेवारीपर्यंत सर्व पेपर आटोपण्याचे नियोजन केले आहे. यासंदर्भातील दिशानिर्देशदेखील तयार झाले असून, महाविद्यालयाच्या पातळीवर परीक्षा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.