शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

By योगेश पांडे | Updated: September 21, 2024 00:05 IST

उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर रोखठोक भाष्य करत जनतेनेच अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केले आहे. ज्यादिवशी लोक ठरवतील की वारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही, तेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपुरात आयोजित विश्व व्याख्यानमालेच्या आठव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा. त्याला तिकीट द्या किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्यादिवशी जनता ठरवेल की वारसाहक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही तेव्हा असे लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा-मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. त्याने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणूकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी आयुर्वेदावरदेखील भाष्य केले. आयुर्वेदात आणखी संशोधनाची आवश्यकता असून औषधांचे स्टॅंडर्डायझेशन व्हायला हवे. औषधांच्या गुणवत्तेवर भर द्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टर असूनदेखील ॲलोपेथीची प्रॅक्टिस काही लोक करतात. ही बाब योग्य नाही. आयुर्वेद हे भारतीय संस्कृती व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. हिमालयातील वनस्पतींवर संशोधन व्हावे. आपल्या देशापेक्षा जर्मनीत आयुर्वेदावर जास्त काम सुरू आहे. आपल्या लोकांनीदेखील आयुर्वेदाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण