शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

By योगेश पांडे | Updated: September 21, 2024 00:05 IST

उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर रोखठोक भाष्य करत जनतेनेच अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केले आहे. ज्यादिवशी लोक ठरवतील की वारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही, तेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपुरात आयोजित विश्व व्याख्यानमालेच्या आठव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा. त्याला तिकीट द्या किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्यादिवशी जनता ठरवेल की वारसाहक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही तेव्हा असे लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा-मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. त्याने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणूकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी आयुर्वेदावरदेखील भाष्य केले. आयुर्वेदात आणखी संशोधनाची आवश्यकता असून औषधांचे स्टॅंडर्डायझेशन व्हायला हवे. औषधांच्या गुणवत्तेवर भर द्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टर असूनदेखील ॲलोपेथीची प्रॅक्टिस काही लोक करतात. ही बाब योग्य नाही. आयुर्वेद हे भारतीय संस्कृती व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. हिमालयातील वनस्पतींवर संशोधन व्हावे. आपल्या देशापेक्षा जर्मनीत आयुर्वेदावर जास्त काम सुरू आहे. आपल्या लोकांनीदेखील आयुर्वेदाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण