शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नितीन गडकरी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री : विदर्भाच्या विकासाला मिळणार नवा ‘बूस्टर डोज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:47 IST

देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देधडाकेबाज कामाची कार्यशैली कायम राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा १३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला. शिवाय वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली आहे आणि नदीकाठच्या काही मोठ्या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे प्रकल्पदेखील कार्यान्वित झाले आहेत. गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र-विदर्भाला मोठ्या आशादिल्लीत काम करत असताना गडकरी यांनी महाराष्ट्र व विदर्भाकडे नेहमीच लक्ष ठेवले. यांच्या पुढाकारातून राज्यात प्रत्यक्षात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम झाले आहे. याशिवाय ६५ मार्गांवर हजारो कोटींची कामे सुरूदेखील आहेत. १४ महामार्गांचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे.नागपूर घेणार ‘ग्लोबल’ झेपगडकरी प्रतिनिधित्व करीत असलेल्या नागपूरचा मागील पाच वर्षांत कायापालट झाला. ‘मेट्रो’ सुरू झाली. शिवाय ‘आयआयएम’, ‘एम्स’ यासारख्या राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील सुरू झाल्या. मोठ्या आयटी कंपन्यांचेदेखील काम सुरू झाले असून पुढील पाच वर्षात शहरात गुंतवणुकीचा ओघ वाढून नागपूर ‘ग्लोबल’ झेप घेणार हे खुद्द गडकरी यांनीच सांगितले आहे.स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्रीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा त्यांनी बदलली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलीस्वयंसेवक ते केंद्रीय मंत्रीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा त्यांनी बदलली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकार