शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याच्या अपघाती मृत्यूनंतर ‘एनएचएआय’ला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

नागपूर : सदर उड्डाणपुलावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर एनएचएआय खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी घटनास्थळी साईन ...

नागपूर : सदर उड्डाणपुलावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर एनएचएआय खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी घटनास्थळी साईन बोर्ड लावण्यात आला आहे. तीन महिन्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी एनएचएआयला घटनास्थळी डायर्व्हशन पॉईंटच्या आधी साईन बोर्ड लावण्याची तसेच भिंतीची उंची वाढविण्यासह अनेक शिफारशी केल्या होत्या. या शिफारशींची अंमलबजावणी केली असती तर जीवन जुमनाकेला आपला जीव गमवावा लागला नसता.

गुरुवारी रात्री बाईकवर स्वार काटोल येथील रहिवासी जीवन जुमनाके (३०) यांचा सदर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झाला होता. जीवन मुंबईच्या आयटी कंपनीत कार्यरत होता. त्याची बहीण रेल्वे क्वाॅर्टरमध्ये राहते. गुरुवारी सायंकाळी तो काटोलवरून नागपूरला आला होता. दरम्यान त्याचा अपघात झाला. जीवन काटोल मार्गाकडून सदरकडे जात होता. मेश्राम चौकाच्या उड्डाणपुलावर डायर्व्हशन आहे. काटोल मार्गाकडून येणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा डायर्व्हशन असल्याचे दुरुन दिसत नाही. डायर्व्हशन पॉईंट जवळ आल्यानंतर अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात होतात. जीवनचा अपघातही याच पद्धतीने झाला आणि तो उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकला. हवेत उसळल्यामुळे तो ५० फूट खाली रस्त्यावरील कारच्या छतावर पडून मृत्यू पावला. सूत्रांनुसार वाहतूक शाखेने तीन महिन्यांपूर्वी एनएचएआयला उड्डाणपुलावरील अपघात थांबविण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. यात डायर्व्हशन पॉईंटवर साईन बोर्ड लावणे, भिंतीची उंची वाढविणे या सूचनांचा समावेश होता. परंतु अपघात झाल्यानंतर घाईगडबडीत आज सकाळी साईन बोर्ड लावण्यात आला. एनएचएआयचे परियोजना संचालक अभिजित जिचकार, वाहतूक शाखेचे निरीक्षक जगवेंद्र राजपूत आणि सदरचे निरीक्षक विनोद चौधरी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. जाणकारांच्या मते उड्डाणपुलाच्या डायर्व्हशन पॉईंटसह अनेक ठिकाणे अपघातामुळे चर्चेत राहिले आहेत. उड्डाणपुलाच्या आरबीआयकडील टोकाच्या उद्घाटनानंतर अनेकदा अपघात झाले आहेत. येथे अनेकदा वाहतूक विस्कळीत होते. बहुतांश वेळा वाहतूक पोलिसही तेथे राहत नाहीत.

...........

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न

जीवनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. पत्नी मुंबईत कार्यरत आहे. वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. कुटुंबात विधवा आई आणि पत्नी आहे. जीवन आठवडाभरापूर्वी मित्राच्या लग्नासाठी काटोलमध्ये आला होता. गुरुवारी लग्नात सहभागी होण्यासाठी तो नागपूरला येत होता. लग्न आटोपल्यानंतर अजनी बहिणीच्या घरी बाईक ठेवून तो मुंबईला जाणार होता.

...........