शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

अभियंत्याच्या अपघाती मृत्यूनंतर ‘एनएचएआय’ला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

नागपूर : सदर उड्डाणपुलावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर एनएचएआय खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी घटनास्थळी साईन ...

नागपूर : सदर उड्डाणपुलावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर एनएचएआय खडबडून जागी झाली. शुक्रवारी सकाळी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी घटनास्थळी साईन बोर्ड लावण्यात आला आहे. तीन महिन्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी एनएचएआयला घटनास्थळी डायर्व्हशन पॉईंटच्या आधी साईन बोर्ड लावण्याची तसेच भिंतीची उंची वाढविण्यासह अनेक शिफारशी केल्या होत्या. या शिफारशींची अंमलबजावणी केली असती तर जीवन जुमनाकेला आपला जीव गमवावा लागला नसता.

गुरुवारी रात्री बाईकवर स्वार काटोल येथील रहिवासी जीवन जुमनाके (३०) यांचा सदर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झाला होता. जीवन मुंबईच्या आयटी कंपनीत कार्यरत होता. त्याची बहीण रेल्वे क्वाॅर्टरमध्ये राहते. गुरुवारी सायंकाळी तो काटोलवरून नागपूरला आला होता. दरम्यान त्याचा अपघात झाला. जीवन काटोल मार्गाकडून सदरकडे जात होता. मेश्राम चौकाच्या उड्डाणपुलावर डायर्व्हशन आहे. काटोल मार्गाकडून येणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा डायर्व्हशन असल्याचे दुरुन दिसत नाही. डायर्व्हशन पॉईंट जवळ आल्यानंतर अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात होतात. जीवनचा अपघातही याच पद्धतीने झाला आणि तो उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकला. हवेत उसळल्यामुळे तो ५० फूट खाली रस्त्यावरील कारच्या छतावर पडून मृत्यू पावला. सूत्रांनुसार वाहतूक शाखेने तीन महिन्यांपूर्वी एनएचएआयला उड्डाणपुलावरील अपघात थांबविण्यासाठी काही सूचना केल्या होत्या. यात डायर्व्हशन पॉईंटवर साईन बोर्ड लावणे, भिंतीची उंची वाढविणे या सूचनांचा समावेश होता. परंतु अपघात झाल्यानंतर घाईगडबडीत आज सकाळी साईन बोर्ड लावण्यात आला. एनएचएआयचे परियोजना संचालक अभिजित जिचकार, वाहतूक शाखेचे निरीक्षक जगवेंद्र राजपूत आणि सदरचे निरीक्षक विनोद चौधरी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. जाणकारांच्या मते उड्डाणपुलाच्या डायर्व्हशन पॉईंटसह अनेक ठिकाणे अपघातामुळे चर्चेत राहिले आहेत. उड्डाणपुलाच्या आरबीआयकडील टोकाच्या उद्घाटनानंतर अनेकदा अपघात झाले आहेत. येथे अनेकदा वाहतूक विस्कळीत होते. बहुतांश वेळा वाहतूक पोलिसही तेथे राहत नाहीत.

...........

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न

जीवनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. पत्नी मुंबईत कार्यरत आहे. वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. कुटुंबात विधवा आई आणि पत्नी आहे. जीवन आठवडाभरापूर्वी मित्राच्या लग्नासाठी काटोलमध्ये आला होता. गुरुवारी लग्नात सहभागी होण्यासाठी तो नागपूरला येत होता. लग्न आटोपल्यानंतर अजनी बहिणीच्या घरी बाईक ठेवून तो मुंबईला जाणार होता.

...........