शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

कोरोनाकाळात वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित आहेत : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 21:11 IST

Nitin Gadkari २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध लेखिका चैताली बांगरे यांनी कोरोना व टाळेबंदीच्या काळातील अनुभवांवर लिहिलेल्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा हे आभासी माध्यमाद्वारे सोहळ्यात सहभागी झाले होते तर व्यासपीठावर प्रख्यात अधिवक्ता फिरदौस मिर्झा व चैताली बांगरे उपस्थित होते.

कोरोना ही एक आपत्ती आहे आणि संक्रमणाची गती आणखी वाढायला लागली आहे. अशा स्थितीत आपत्तीचे रूपांतरण इष्टापत्तीत करण्यासाठी प्रचंड चिंतनाची गरज आहे. समस्या उद्भवल्या तर मार्गही शोधावाच लागतो. आपल्याकडे पीपीई किट नव्हत्या तर नागपुरात निर्माणाच्या संधी शोधून त्याचा पुरवठा केला गेला. सॅनिटायझर हजार रुपये लिटर विकले जात होते. तेव्हा नागपूरच्या शुगर कारखान्यातच अल्कोहोलद्वारे सॅनिटायझर निर्माण करवून ते दीडशे रुपये लिटर पर्यंत सर्वसामान्यांना उपलब्ध करता आले. एकमेकांची मदत करण्याची वृत्ती याच काळात दिसून आली. समाजाची ही शक्ती आपल्या जीवनमूल्यांची देण असल्याची भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

या काळाने वेळेचे महत्त्व कळले आणि नातेवाईक, घर आणि जबाबदारीचे महत्त्व सगळ्यांना कळले. कोरोना हे संकट असले तरी या संकटाने आपुलकीची जाणिवही करवून दिली, अशी भावना विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आरजे नमन यांनी केले तर आभार विनय पाण्डे यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMediaमाध्यमे