शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित आहेत : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 21:11 IST

Nitin Gadkari २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध लेखिका चैताली बांगरे यांनी कोरोना व टाळेबंदीच्या काळातील अनुभवांवर लिहिलेल्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा हे आभासी माध्यमाद्वारे सोहळ्यात सहभागी झाले होते तर व्यासपीठावर प्रख्यात अधिवक्ता फिरदौस मिर्झा व चैताली बांगरे उपस्थित होते.

कोरोना ही एक आपत्ती आहे आणि संक्रमणाची गती आणखी वाढायला लागली आहे. अशा स्थितीत आपत्तीचे रूपांतरण इष्टापत्तीत करण्यासाठी प्रचंड चिंतनाची गरज आहे. समस्या उद्भवल्या तर मार्गही शोधावाच लागतो. आपल्याकडे पीपीई किट नव्हत्या तर नागपुरात निर्माणाच्या संधी शोधून त्याचा पुरवठा केला गेला. सॅनिटायझर हजार रुपये लिटर विकले जात होते. तेव्हा नागपूरच्या शुगर कारखान्यातच अल्कोहोलद्वारे सॅनिटायझर निर्माण करवून ते दीडशे रुपये लिटर पर्यंत सर्वसामान्यांना उपलब्ध करता आले. एकमेकांची मदत करण्याची वृत्ती याच काळात दिसून आली. समाजाची ही शक्ती आपल्या जीवनमूल्यांची देण असल्याची भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

या काळाने वेळेचे महत्त्व कळले आणि नातेवाईक, घर आणि जबाबदारीचे महत्त्व सगळ्यांना कळले. कोरोना हे संकट असले तरी या संकटाने आपुलकीची जाणिवही करवून दिली, अशी भावना विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आरजे नमन यांनी केले तर आभार विनय पाण्डे यांनी मानले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMediaमाध्यमे