शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

उपचाराअभावी नवजात बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री वाटेतच प्रसुती झाली. नवजात बाळ व त्याच्या आईला लगेच प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. मात्र, तिथे नवजात बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचा मृत्यू याेग्य उपचाराअभावी झाल्याचा आराेप आईसह कुटुंबीयांनी केल्याने तसेच दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

अंजना रवींद्र चाचेरकर (रा. वेलतूर, ता. कुही) यांना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्याने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. त्यावेळी आराेग्य केंद्रात डाॅक्टर अथवा परिचारिका कुणीही नव्हते. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी लगेच दवाखान्याच्या आवारातील निवासस्थानात राहणाऱ्या परिचारिकेला बाेलावले. मात्र, परिचारिका एक तास उशिरा पाेहाेचली. त्या परिचारिका आपल्याशी उर्मटपणे बाेलल्या तसेच मला बाेलवायचे नाही. मला त्रास दिल्यास नागपूरला रेफर करेन, असे सुनावले व निघून गेल्या, असेही महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.

त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला लगेच नागपूरला रवाना केले. नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता, तिथे नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील हयगय व घडामाेडींमुळे झाल्याचा आराेप कुटुंबीयांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा सहाय्यक आराेग्य अधिकारी डाॅ. हेमके यांनी शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता वेलतूर आराेग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी बाळाचे कुटुंबीय व आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे जबाब नाेंदवून घेतले. या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

........

वाटेतच झाली प्रसुती

अंजना चाचेरकर यांना वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रात आणल्यानंतर त्यांच्यावर तिथे सुरुवातीला एक तासाने जुजबी उपचाराला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळात परिचारिका निघून गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना नागपूरला हलवले. त्यामुळे बाळाचा वेलतूर-नागपूर दरम्यान वाटेतच मृत्यू झाला. दाेघांनाही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे काही वेळात नवजात बाळाचा मृत्यू झाला. अंजना चाचेरकर यांच्यावर वेलतूर येथेच उपचार करून तिथे त्यांची प्रसुती झाली असती तर नवजात बाळाच्या जीविताला धाेका उद्भवला नसता, असेही चाचेरकर कुटुंबीयांनी सांगितले.