शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

उपचाराअभावी नवजात बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री वाटेतच प्रसुती झाली. नवजात बाळ व त्याच्या आईला लगेच प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. मात्र, तिथे नवजात बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचा मृत्यू याेग्य उपचाराअभावी झाल्याचा आराेप आईसह कुटुंबीयांनी केल्याने तसेच दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

अंजना रवींद्र चाचेरकर (रा. वेलतूर, ता. कुही) यांना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्याने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. त्यावेळी आराेग्य केंद्रात डाॅक्टर अथवा परिचारिका कुणीही नव्हते. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी लगेच दवाखान्याच्या आवारातील निवासस्थानात राहणाऱ्या परिचारिकेला बाेलावले. मात्र, परिचारिका एक तास उशिरा पाेहाेचली. त्या परिचारिका आपल्याशी उर्मटपणे बाेलल्या तसेच मला बाेलवायचे नाही. मला त्रास दिल्यास नागपूरला रेफर करेन, असे सुनावले व निघून गेल्या, असेही महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.

त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला लगेच नागपूरला रवाना केले. नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता, तिथे नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील हयगय व घडामाेडींमुळे झाल्याचा आराेप कुटुंबीयांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा सहाय्यक आराेग्य अधिकारी डाॅ. हेमके यांनी शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता वेलतूर आराेग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी बाळाचे कुटुंबीय व आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे जबाब नाेंदवून घेतले. या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

........

वाटेतच झाली प्रसुती

अंजना चाचेरकर यांना वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रात आणल्यानंतर त्यांच्यावर तिथे सुरुवातीला एक तासाने जुजबी उपचाराला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळात परिचारिका निघून गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना नागपूरला हलवले. त्यामुळे बाळाचा वेलतूर-नागपूर दरम्यान वाटेतच मृत्यू झाला. दाेघांनाही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे काही वेळात नवजात बाळाचा मृत्यू झाला. अंजना चाचेरकर यांच्यावर वेलतूर येथेच उपचार करून तिथे त्यांची प्रसुती झाली असती तर नवजात बाळाच्या जीविताला धाेका उद्भवला नसता, असेही चाचेरकर कुटुंबीयांनी सांगितले.