शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

नववर्षात येणार ई-म्युटेशन

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

राज्यातील फडणवीस सरकारकडून आगामी नवीन वर्षापासून सरकारी सेवा अधिक गतिशील आणि सुकर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ‘ई-म्युटेशन’ आणि ‘ई ७/१२’चाही समावेश राहणार आहे.

हस्तलिखित ७/१२ होणार बाद: ‘डिजीटल इंडिया’कडे वाटचालनागपूर : राज्यातील फडणवीस सरकारकडून आगामी नवीन वर्षापासून सरकारी सेवा अधिक गतिशील आणि सुकर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ‘ई-म्युटेशन’ आणि ‘ई ७/१२’चाही समावेश राहणार आहे.केंद्र सरकारचा ‘डिजीटल इंडिया’ही योजना राज्यात राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने त्यांनी २१ नोव्हेंबरला मुंबईत बैठक घेऊन राज्यातील ‘ई-सेवां’चा आढावा घेतला तसेच डिजीटल इंडिया’ची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ‘ई-सेवां’चा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘ ई-म्युटेशन’ बंधनकारक करण्याच्या सूचना केल्या त्यासाठी १ जानेवारी २०१५ पर्यंतची मुदत देण्यात आली. यासंदर्भातील जबाबदारी महसूल व जमाबंदी आयुक्तांकडे देण्यात आली. ‘‘ई -म्युटेशन’च्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून ७/१२ उतारा अद्ययावत होत नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे कारण ऐकून घेतले जाणार नाही, असे स्पष्टपणे बजावले. दरम्यान काळात ७/१२ रेकॉर्ड डिजीटलायझेशन करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. १ एप्रिल २०१५ नंतर ७/१२ ची संकेतस्थळावरून काढलेली आणि तलाठ्याकडून घेतलेली हस्तलिखित प्रत यात फरक राहणार नाही तसेच अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १ एप्रिल २०१५ नंतर हस्तलिखित ७/१२ देण्याची पद्धत बाद होणार आहे. आरटीआय ची प्रक्रियाही पुढच्या काळात आॅनलाईन करण्यात येणार आहे. मंत्रालयात १ जानेवारीपासून तर राज्यात १ एप्रिल २०१५ पासून ती सुरू करण्याची मुदत देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)