शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

नवीन कामाचे कार्यादेश थांबविले

By admin | Updated: June 24, 2015 02:54 IST

आर्थिक स्थिती बिकट असल्याने व तिजोरीत पैसा जमा होण्याची गती संथ झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन कार्यादेश देण्याचे थांबविले आहे.

महापालिका : आर्थिक संकटामुळे निर्णयनागपूर : आर्थिक स्थिती बिकट असल्याने व तिजोरीत पैसा जमा होण्याची गती संथ झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन कार्यादेश देण्याचे थांबविले आहे. मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २०० कोटींची बिले प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी वित्त विभागाने यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अवगत केले आहे. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या दोन महिन्यापर्यंत अपेक्षेच्या तुलनेत ९० कोटींचे उत्पन्न कमी झाले. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. नियमित होणारी आवक घटली आहे. याचा विचार करून आयुक्तांनी १२९४.७५ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. त्यानुसार अर्थसंकल्पापूर्वी एप्रिल व मे महिन्यात २१५.७९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात १२४.२४ कोटींचा महसूल जमा झाला. दुसरीकडे दर महिन्याच्या खर्चात वाढ झाली असून, हा खर्च ६५ वरून ६८ कोटींवर गेला आहे. मनपातील कंत्राटदारांची १५० कोटींची बिले प्रलंबित असल्याची माहिती कंत्राटदार संघटनेचे विजय नायडू यांनी दिली. दुसरीकडे लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या मते, ५० कोटींची बिल देणे आहे. आवक घटल्याने काही दिवस नवीन कार्यादेश थांबविण्यात आले आहे. वेतन देण्यालाही विलंब होत असल्याची कबुली हर्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)