शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

हे तर नवलच ! महिलेला भरायचे होते चिल्लर पैशांनी वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

राकेश घानोडे नागपूर : वाचून कुणालाही नवल वाटेल; पण हे खरे आहे. एका महिलेला ३६ हजार २० रुपयाचे वीज ...

राकेश घानोडे

नागपूर : वाचून कुणालाही नवल वाटेल; पण हे खरे आहे. एका महिलेला ३६ हजार २० रुपयाचे वीज बिल चक्क १, २, ५ व १० रुपये... अशा चिल्लर नाण्यांनी भरायचे होते. त्यासाठी तिने महावितरणला पत्रही लिहिले होते. महावितरणने असे करता येणार नसल्याचे कळविल्यानंतरदेखील महिला शांत बसली नाही. तिने अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. आयोगानेही या संदर्भात कायदेशीर तरतूद नसल्याचे सांगून तिची मागणी फेटाळून लावली.

लक्ष्मी ठाकरे असे महिलेचे नाव असून त्या कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. त्यांना फेब्रुवारी-२०२० ते जानेवारी-२०२१ या कालावधीकरिता ३६ हजार २० रुपयाचे बिल देण्यात आले आहे. हे बिल वेळेत भरण्यात न आल्यामुळे महावितरणने १२ मार्च २०२१ रोजी वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यावर आक्षेप घेऊन ठाकरे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. चिल्लर पैशांनी वीज बिल जमा करण्यास तयार असताना करण्यात आलेली ही कारवाई अवैध आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ग्राहक आयोगाने कायदेशीर बाबी तपासल्यानंतर ठाकरे याच अवैधपणे वागत असल्याचे स्पष्ट केले. महावितरणने बँक ऑफ महाराष्ट्रच्या पत्राचा संदर्भ देऊन एक रुपयावरील मूल्याच्या चिल्लर पैशांद्वारे १००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारता येत नसल्याचे कळविले होते. असे असताना ठाकरे यांनी थकीत वीज बिल न भरता रोज १००० रुपये जमा करण्याची मुभा मागितली. ठाकरे यांची ही कृती अयोग्य आहे व या कृतीला कुठलाही कायदेशीर आधार नाही, अशी समज आयोगाने दिली. महावितरणने वीज बिल जमा करण्यासाठी ग्राहकाच्या सोयीसाठी रोख रक्कम, धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन पेमेंट, इत्यादी कायदेशीर पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी त्याचे पालन करायला पाहिजे. ग्राहकावर थकबाकीची एकमुस्त रक्कम जमा करण्याचे कायदेशीर बंधन आहे, असे आयोगाने सांगितले. आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला.

--------------

ठाकरे यांच्यावर ताशेरे

वीज बिल जमा करण्यातील अनियमितता व वाढलेली थकबाकी पाहता ठाकरे या स्वत: दोषी असल्याचे आणि असे असतानादेखील त्या आडमुठेपणाने विनाकारण पत्रव्यवहार करून थकबाकी जमा करण्यास विलंब करीत असल्याचे सिद्ध होते. तसेच, त्यांनी कायदेशीर तरतुदीचा अयोग्य अर्थ लावून अनावश्यक वाद उपस्थित केल्याचे दिसते. कायद्याचे अज्ञान हे बचावाचे कारण ठरू शकत नाही; त्यामुळे ठाकरे या सहानुभूती मिळण्यास पात्र नाहीत, असे ताशेरेही आयोगाने हा निर्णय देताना ओढले.