शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वन्यजीवांच्या अधिवासासाठी नव्याने हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : धोकाग्रस्त असलेल्या अतिसंवेदनशील वन्यजीवांचा अधिवास ठरविण्यासाठी २०१८ मध्ये गठित करण्यात आलेल्या समित्यांचे रेंगाळलेले काम आता पुन्हा नव्या ...

नागपूर : धोकाग्रस्त असलेल्या अतिसंवेदनशील वन्यजीवांचा अधिवास ठरविण्यासाठी २०१८ मध्ये गठित करण्यात आलेल्या समित्यांचे रेंगाळलेले काम आता पुन्हा नव्या समित्यांच्या आखणीनंतर सुरू झाले आहे. या समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांच्या नावावरील आक्षेपामुळे मागील दोन वर्षांपासून हे काम खोळंबले होते. ते आता पुन्हा नव्याने सुरू झाले आहे.

१० ऑगस्ट २०१८ मध्ये या संदर्भात आखणी करून राज्यातील अतिसंवेदनशील वनक्षेत्रांच्या अभ्यासासाठी समित्या गठित करण्यात आल्या होत्या, मात्र त्या समित्यांवर स्थानिकांची नियुक्ती न करता बाहेरील व्यक्तींचा भरणा केल्याचा आक्षेप वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून घेण्यात आला होता. पुढे हे प्रकरण न्यायालयातही पोहचले होते. नंतरच्या घडामोडीत या समित्यांची फेररचना करून स्थानिकांना सदस्यत्व देण्याचे ठरले. त्यामुळे पूर्वीच्या समित्या रद्द ठरवून नव्याने समित्यांचे गठन झाले आहे. यात स्थानिक स्तरावरील जंगलालगतच्या गावांमधील सरपंच, स्थानिक वन्यजीवप्रेमी व अभ्यासक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून अहवाल द्यायचा आहे. वन्यजीवांचा वावर आणि संख्या लक्षात घेता अतिसंवेदनशील अधिवास ठरविताना स्थानिक जंगलाचा अभ्यास करून तसेच प्राण्यांची संख्या लक्षात घेऊन अहवाल द्यायचा आहे. वाढलेल्या वन्यजीवांमुळे वनव्याप्त तसेच वनालगतच्या गावांना असलेले धोकेही या समितीच्या माध्यमातून सरकारपुढे मांडायचे आहेत. यामुळे गावांच्या स्थलांतरणाच्या प्रक्रियेला गती येऊन त्यातील गांभीर्य शासनापुढे जाणार आहे.

अलीकडे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, अंधारी वन्यजीव अभयारण्यातील समित्यांची बैठक झाली. येथील दोन गावे वनव्याप्त असल्याने आणि बफर क्षेत्रात असल्याने त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव या समित्यांनी दिला आहे.

...

आदिवासी विकास विभागाची जबाबदारी वाढणार

राज्यातील ५२ वन्यजीव आणि व्याघ्र प्रकल्पांसंदर्भातील नव्याने गठित करण्यात आलेल्या या समित्यांमध्ये आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामुळे या विभागाची जबाबदारी आता वाढणार आहे. वनांचा आणि आदिवासी विकासाचा संबंध जवळचा आहे. बहुतेक वनव्याप्त गावे आदिवासीबहुल असतात. त्यामुळे अशा गावांचे पुनर्वसन करताना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून यंत्रणा राबविली जावी, असा प्रस्ताव यापूर्वी सरकारपुढे ठेवण्यात आला होता. समितीमधील समावेशामुळे या विभागाची जबाबदारी आता वाढणार आहे.

...