शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांच्या अधिवासासाठी नव्याने हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : धोकाग्रस्त असलेल्या अतिसंवेदनशील वन्यजीवांचा अधिवास ठरविण्यासाठी २०१८ मध्ये गठित करण्यात आलेल्या समित्यांचे रेंगाळलेले काम आता पुन्हा नव्या ...

नागपूर : धोकाग्रस्त असलेल्या अतिसंवेदनशील वन्यजीवांचा अधिवास ठरविण्यासाठी २०१८ मध्ये गठित करण्यात आलेल्या समित्यांचे रेंगाळलेले काम आता पुन्हा नव्या समित्यांच्या आखणीनंतर सुरू झाले आहे. या समित्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांच्या नावावरील आक्षेपामुळे मागील दोन वर्षांपासून हे काम खोळंबले होते. ते आता पुन्हा नव्याने सुरू झाले आहे.

१० ऑगस्ट २०१८ मध्ये या संदर्भात आखणी करून राज्यातील अतिसंवेदनशील वनक्षेत्रांच्या अभ्यासासाठी समित्या गठित करण्यात आल्या होत्या, मात्र त्या समित्यांवर स्थानिकांची नियुक्ती न करता बाहेरील व्यक्तींचा भरणा केल्याचा आक्षेप वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून घेण्यात आला होता. पुढे हे प्रकरण न्यायालयातही पोहचले होते. नंतरच्या घडामोडीत या समित्यांची फेररचना करून स्थानिकांना सदस्यत्व देण्याचे ठरले. त्यामुळे पूर्वीच्या समित्या रद्द ठरवून नव्याने समित्यांचे गठन झाले आहे. यात स्थानिक स्तरावरील जंगलालगतच्या गावांमधील सरपंच, स्थानिक वन्यजीवप्रेमी व अभ्यासक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून अहवाल द्यायचा आहे. वन्यजीवांचा वावर आणि संख्या लक्षात घेता अतिसंवेदनशील अधिवास ठरविताना स्थानिक जंगलाचा अभ्यास करून तसेच प्राण्यांची संख्या लक्षात घेऊन अहवाल द्यायचा आहे. वाढलेल्या वन्यजीवांमुळे वनव्याप्त तसेच वनालगतच्या गावांना असलेले धोकेही या समितीच्या माध्यमातून सरकारपुढे मांडायचे आहेत. यामुळे गावांच्या स्थलांतरणाच्या प्रक्रियेला गती येऊन त्यातील गांभीर्य शासनापुढे जाणार आहे.

अलीकडे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, अंधारी वन्यजीव अभयारण्यातील समित्यांची बैठक झाली. येथील दोन गावे वनव्याप्त असल्याने आणि बफर क्षेत्रात असल्याने त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव या समित्यांनी दिला आहे.

...

आदिवासी विकास विभागाची जबाबदारी वाढणार

राज्यातील ५२ वन्यजीव आणि व्याघ्र प्रकल्पांसंदर्भातील नव्याने गठित करण्यात आलेल्या या समित्यांमध्ये आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामुळे या विभागाची जबाबदारी आता वाढणार आहे. वनांचा आणि आदिवासी विकासाचा संबंध जवळचा आहे. बहुतेक वनव्याप्त गावे आदिवासीबहुल असतात. त्यामुळे अशा गावांचे पुनर्वसन करताना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून यंत्रणा राबविली जावी, असा प्रस्ताव यापूर्वी सरकारपुढे ठेवण्यात आला होता. समितीमधील समावेशामुळे या विभागाची जबाबदारी आता वाढणार आहे.

...