शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नवमातांनो, काळजी घ्या.. बाळाच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने होतोय ‘हा’ अनर्थ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 08:00 IST

Nagpur News आईने दूध पाजल्यानंतर ते श्वासनलिकेत गेल्यामुळे श्वास गुदमरून बाळाचा मृत्यू झाल्याच्या ४४ घटना वर्षभरात घडल्या आहेत.

सुमेध वाघमारे

नागपूर : गोंदिया येथून एक महिला आपल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन नागपुरात नातेवाइकांकडे आली. दुपारी बाळाला दूध पाजले आणि लगेच पाळण्यात टाकले. अर्ध्या तासानंतर बाळाला उठवायला गेले असताना ते थंड पडले होते. डॉक्टरांना दाखविल्यावर मृत घोषित केले. दूध श्वसननलिकेत गेल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे निदान झाले. दुसऱ्या घटनेत २० दिवसांच्या नवजात बाळाला आई झोपून दूध पाजत असताना त्याचा गुदमरून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, नागपूर जिल्ह्यात यासारख्या घटनांमधून वर्षभरात ४४ तान्हुल्यांचा घरीच मृत्यू झाला. काही घटना वगळता निष्काळजीपणाचा हा कळस असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अकाली जन्म, जन्मत: कमी वजन; जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, श्वसनावरोध, आघात, अशी नवजात बालकांच्या रुग्णालयातील मृत्यूची कारणे आहेत; परंतु घरी असलेल्या नवजात बाळाला सांभाळताना झालेली एक चूकदेखील महागात पडू शकते. बालके नि:शब्द असतात, ते आपल्या समस्या कृत्यातून आणि रडण्यातून मांडतात. यामुळे बाळाचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांना सतत सावध राहून बाळाच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असते. थोडासा हलगर्जीपणादेखील बाळाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते. नुकतीच याची ही दोन उदाहरणे समोर आली आहेत.

- वर्षभरात १,३८१ बालकांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या दरम्यान १,३८१ बालकांचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये ८०२, मेयोमध्ये २४८, डागा रुग्णालयात ३९, खासगी रुग्णालयात २४८, तर घरात मृत्यू झालेल्या बाळांची संख्या ४४ आहे. या आकडेवारीनुसार दर महिन्याला जवळपास ६० ते १०० बालकांचा विविध कारणाने मृत्यू होतो. बहुसंख्य मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यानातील आहेत; परंतु जे घरी मृत्यू झालेले आहेत ते वाचविणे शक्य असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- महिन्याकाठी २ ते ४ बाळांचा घरीच मृत्यू

नागपुरात महिन्याकाठी जवळपास २ ते ४ बाळांचा घरीच मृत्यू होत असल्याचे पुढे आले आहे. एप्रिलमध्ये २, मेमध्ये ५, जूनमध्ये ०, जुलैमध्ये २, ऑगस्टमध्ये ५, सप्टेंबरमध्ये २, ऑक्टोबरमध्ये ४, नोव्हेंबरमध्ये ४, डिसेंबरमध्ये १, जानेवारीमध्ये १०, फेब्रुवारीमध्ये ३, तर मार्चमध्ये ६ बालकांचा घरीच मृत्यू झाला.

-झोपून दूध पाजू नका- डॉ. गावंडे

बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, ज्या घरात नवजात बाळ आहे त्यांनी अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे असते. बाळाला झोपून दूध पाजू नये. दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढावी. बाळ ढेकर देईलच असे नाही; परंतु दूध दिल्यानंतर त्याला हळुवार उचलून धरावे. त्यानंतर बाळाला डाव्या कुशीवर थोडे उंच ठेवून झोपवावे. बाळाला ठाराविक वेळेत थोडे थोडे दूध पाजावे. भुकेलेले बाळ पटापट दूध पिते व जास्तीचे प्यालेले दूध बाहेर टाकते अशावेळी श्वसननलिकेत दूध जाण्याची भीती असते. कमी वजनाचे बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी. रात्री नवजात बाळाजवळ झोपताना खबरदारी घ्यावी. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्य