शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

८५ शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : भारतीय स्टेट बॅंकेच्या जलालखेडा (ता. नरखेड) शाखेचे बुधवार (दि. २३)पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ५ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : भारतीय स्टेट बॅंकेच्या जलालखेडा (ता. नरखेड) शाखेचे बुधवार (दि. २३)पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ५ काेटी ९ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केल्याची माहिती बॅंक व्यवस्थापनाने दिली. यात ८५ शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यात आले असून, ३५६ शेतकऱ्यांच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

नव्याने कर्जदार झालेल्या ८५ शेतकऱ्यांना १ काेटी ८५ लाख रुपयांचे तर जुन्या कर्जदार ३५६ शेतकऱ्यांना ३ काेटी ८५ लाख रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केला, त्यातील पात्र शेतकऱ्यांना एक आठवड्याच्या आत कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती बॅंक शाखा व्यवस्थापक मनीष गाैरखेडे यांनी दिली. कर्जाचे नुतनीकरण त्याच दिवशी करण्यात आल्याचे मनीष गाैरखेडे यांनी स्पष्ट केले. वेळीच कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

...

प्राेत्साहन निधीची प्रतीक्षा

राज्य शासनाने नियमित पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये प्राेत्साहन निधी जमा करण्याची घाेषणा केली हाेती. भारतीय स्टेट बॅंकेच्या जलालखेडा शाखेत अनेक कर्जदार शेतकरी पीक कर्जाचा नियमित भरणा करतात. मात्र, यातील कुणालाही या ५० हजार प्राेत्साहन निधी याेजनेचा लाभ मिळाला नाही. ही रक्कम कधी मिळणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

भारतीय स्टेट बॅंकेने माझे पीक कर्ज एका दिवसात नुतनीकरण करून दिले. नव्याने दिलेल्या कर्जात केवळ चार हजार रुपयांची वाढ केली. कमी पैशात शेती करणे अवघड झाले आहे.

- कुंदा ठाेंबरे, शेतकरी,

मुक्तापूर पेठ, ता. नरखेड.

...

पीक कर्ज वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज आठवडाभरात तर नुतनीकरण एका दिवसात करून कर्ज दिले जात आहे. सध्या आमच्याकडे एकाही शेतकऱ्याचा अर्ज शिल्लक नाही. आम्ही आजवर ५ काेटी ९ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे.

- मनीष गाैरखेडे, शाखा व्यवस्थापक,

भारतीय स्टेट बॅंक, जलालखेडा.

===Photopath===

240621\img_20210624_132354.jpg

===Caption===

फोटो ओळी :- जलालखेडा येथील भारतीय स्टेट बँक.