शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:41 IST

नागपूरच्या गुन्हेगारीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगारांची भर पडत आहे.

राहुल अवसरे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगारांची भर पडत आहे. ही धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात आहे. मात्र शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने वारंवार गुन्हा करण्याचे प्रमाण नगण्य आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१५ मध्ये भारतीय दंड विधान अंतर्गत ११ हजार १८ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यात १० हजार ४७९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. हे सर्व गुन्हेगार नवीन होते. २०१४ मध्ये १० हजार २७४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. २०१४ च्या मानाने २०१५ मध्ये झालेली वाढ ३.०६ टक्के होती.

लैंगिक छळाचे ४३७ गुन्हेगारबलात्काराच्या घडलेल्या एकूण १६६ घटनांमध्ये १८३ पीडित होत्या. या गुन्ह्यात २०१ जणांना अटक करण्यात आली होती. लैंगिक छळाच्या ३९२ गुन्ह्यात ४३७ जणांना अटक करण्यात आली होती. विवाहितांच्या संदर्भातील गुन्हेगारी अंतर्गत हुंडाबळीच्या ९ गुन्ह्यात २४, आणि पतीकडून विवाहितेच्या छळाच्या ३०९ घटना घडून ६६१ जणांना अटक करण्यात आली होती.विश्वासघाताच्या ७३ घटनांमध्ये ७३, फसवणुकीच्या ३१३ घटनांमध्ये ३५२ आणि दस्तावेज हेरफेरीच्या ७७ गुन्ह्यात ६० जणांना अटक करण्यात आली होती. गैरकायद्याची मंडळी जमवण्याच्या २४ घटनांमध्ये ९८ आणि दंग्याच्या १४२ घटनांमध्ये ७४५ जणांना अटक करण्यात आली होती.

चोरांचा सुळसुळाटउपराजधानीच्या या शहरात चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येते. घरफोडीच्या १०७९ घटना घडून ४०९ जणांना अटक करण्यात आली होती. तर चोरीच्या ३०४४ घटना घडून १३५९ जणांना अटक करण्यात आली होती. दरोडा घालणाऱ्या ११३ आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या १३३ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच जबरीचोरीत ४६४ घटना घडून ५६२ जणांना अटक करण्यात आली होती. यात मंगळसूत्र पळविणाऱ्या गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अपहरण अधिक,अटक कमीअपहरणाच्या ३५५ घटना घडून त्यात ३८३ लोक पीडित होते. या गुन्ह्यात ११२ जणांना अटक करण्यात आली होती. अपहरणाचे गुन्हे अधिक असले तर अटक मात्र फारच कमी होती. या उलट खंडणी वसुलीच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातील अटक संख्या दुप्पट होती. खंडणी वसुलीचे ७८ गुन्हे घडून १५० गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. खून ७९, अटक २१२खुनाच्या ७९ घटनांमध्ये ८६ जणांचा मृत्यू होऊन २१२ जणांना अटक करण्यात आली होती. खुनाच्या प्रयत्नाच्या ८४ घटनांमध्ये ८७ जण जखमी होऊन २४७ जणांना अटक करण्यात आली होती. गंभीर दुखापतीच्या २३३ गुन्ह्यात तेवढेच जखमी होऊन ३०९ जणांना अटक करण्यात आली होती.