शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

उपराजधानीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:41 IST

नागपूरच्या गुन्हेगारीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगारांची भर पडत आहे.

राहुल अवसरे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरच्या गुन्हेगारीत दरवर्षी दहा हजारावर नवीन गुन्हेगारांची भर पडत आहे. ही धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात आहे. मात्र शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने वारंवार गुन्हा करण्याचे प्रमाण नगण्य आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१५ मध्ये भारतीय दंड विधान अंतर्गत ११ हजार १८ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यात १० हजार ४७९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. हे सर्व गुन्हेगार नवीन होते. २०१४ मध्ये १० हजार २७४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. २०१४ च्या मानाने २०१५ मध्ये झालेली वाढ ३.०६ टक्के होती.

लैंगिक छळाचे ४३७ गुन्हेगारबलात्काराच्या घडलेल्या एकूण १६६ घटनांमध्ये १८३ पीडित होत्या. या गुन्ह्यात २०१ जणांना अटक करण्यात आली होती. लैंगिक छळाच्या ३९२ गुन्ह्यात ४३७ जणांना अटक करण्यात आली होती. विवाहितांच्या संदर्भातील गुन्हेगारी अंतर्गत हुंडाबळीच्या ९ गुन्ह्यात २४, आणि पतीकडून विवाहितेच्या छळाच्या ३०९ घटना घडून ६६१ जणांना अटक करण्यात आली होती.विश्वासघाताच्या ७३ घटनांमध्ये ७३, फसवणुकीच्या ३१३ घटनांमध्ये ३५२ आणि दस्तावेज हेरफेरीच्या ७७ गुन्ह्यात ६० जणांना अटक करण्यात आली होती. गैरकायद्याची मंडळी जमवण्याच्या २४ घटनांमध्ये ९८ आणि दंग्याच्या १४२ घटनांमध्ये ७४५ जणांना अटक करण्यात आली होती.

चोरांचा सुळसुळाटउपराजधानीच्या या शहरात चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येते. घरफोडीच्या १०७९ घटना घडून ४०९ जणांना अटक करण्यात आली होती. तर चोरीच्या ३०४४ घटना घडून १३५९ जणांना अटक करण्यात आली होती. दरोडा घालणाऱ्या ११३ आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या १३३ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच जबरीचोरीत ४६४ घटना घडून ५६२ जणांना अटक करण्यात आली होती. यात मंगळसूत्र पळविणाऱ्या गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अपहरण अधिक,अटक कमीअपहरणाच्या ३५५ घटना घडून त्यात ३८३ लोक पीडित होते. या गुन्ह्यात ११२ जणांना अटक करण्यात आली होती. अपहरणाचे गुन्हे अधिक असले तर अटक मात्र फारच कमी होती. या उलट खंडणी वसुलीच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातील अटक संख्या दुप्पट होती. खंडणी वसुलीचे ७८ गुन्हे घडून १५० गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. खून ७९, अटक २१२खुनाच्या ७९ घटनांमध्ये ८६ जणांचा मृत्यू होऊन २१२ जणांना अटक करण्यात आली होती. खुनाच्या प्रयत्नाच्या ८४ घटनांमध्ये ८७ जण जखमी होऊन २४७ जणांना अटक करण्यात आली होती. गंभीर दुखापतीच्या २३३ गुन्ह्यात तेवढेच जखमी होऊन ३०९ जणांना अटक करण्यात आली होती.