शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

नागपूरला प्रदूषणमुक्त करण्याचा ‘नीरी’चा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 02:40 IST

राज्यातील १० शहरे प्रदूषणमुक्त करण्याचे काम ‘नीरी’ने हाती घेतले आहे. नागपूरसमोर आज वायुप्रदूषणाची फारशी समस्या नसली ....

राकेश कुमार : नदी स्वच्छतेसाठी ऊर्जा बचत करणारे तंत्रज्ञान वापरणे गरजेचेनागपूर : राज्यातील १० शहरे प्रदूषणमुक्त करण्याचे काम ‘नीरी’ने हाती घेतले आहे. नागपूरसमोर आज वायुप्रदूषणाची फारशी समस्या नसली तरी येत्या ३ ते ४ वर्षात नागपूरमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढणार आहे. शहर प्रदूषणमुक्त रहावे यासाठी ‘नीरी’ प्रयत्न करत आहे, अशी माहिती ‘नीरी’चे नवनियुक्त संचालक डॉ.राकेश कुमार यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मंगळवारी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला व आगामी कामाची रुपरेषा मांडली.गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. या मोहिमेसाठी ‘नीरी’तर्फे ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’चा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तांत्रिक व वैज्ञानिकदृष्ट्या गंगा नदी १०० टक्के स्वच्छ होऊ शकते. परंतु नदीमध्ये नाल्यांद्वारे येणारे सांडपाणी थांबविणे तसेच यंत्रणेची देखरेख हे सर्वात मोठे आव्हान आहे. नागनदीची स्थितीदेखील अशीच आहे. गंगा प्रकल्पावर ‘नीरी’ची ‘टीम’ काम करत असून ही ‘टीम’ गोमुख ते गंगासागरपर्यंतचा अभ्यास करणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. आतापर्यंतच्या पाहणीत अलाहाबाद, कानपूर, पटणा येथे गंगानदीत सर्वात जास्त प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याचे आढळून आल्याचेदेखील त्यांनी सांगितले. नदी स्वच्छता असो किंवा वायुप्रदूषण कमी करणारी यंत्रणा, ऊर्जाबचत करणारे तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)कार्यपद्धती बदलविण्यावर देणार भरसाधारणत: ‘नीरी’त विविध समस्यांवर संशोधन करून अहवाल तयार करुन देण्यात येतो. परंतु या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झाली की नाही याबाबत कुठलाही पाठपुरावा करण्यात येत नाही. या कार्यप्रणालीत आता बदल करण्यात येऊन अभ्यासातील शिफारशींवर प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही यावर भर देण्यात येणार असल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.