शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

वैदर्भीय साहित्याचा मागोवा घेण्याची गरज

By admin | Updated: September 19, 2016 02:49 IST

विदर्भातील साहित्यिकांनी अनेक दर्जेदार रचना केल्या आहेत. मात्र हे साहित्य लोकापर्यंत पोहचत नाही.

वामनराव तेलंग : शंकर बडे व मालतीतार्इंच्या रचनांचे विवेचननागपूर : विदर्भातील साहित्यिकांनी अनेक दर्जेदार रचना केल्या आहेत. मात्र हे साहित्य लोकापर्यंत पोहचत नाही. कधी कधी हे साहित्य वरवरचे वाटते व वाचताना खोल तळाशी रुजत नाही. काही साहित्यिकांना सर्वमान्यता मिळाली, मात्र अनेकांच्या रचना दुर्लक्षित राहिल्या आहेत. अशा विदर्भातील साहित्याचा मागोवा घेण्याची गरज आहे, असे मत विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामनराव तेलंग यांनी केले. वि.सा. संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.वि.सा. संघाच्यावतीने ग्रंथसहवास येथे रचनेच्या खोल तळाशी या कार्यक्रमात विदर्भातील साहित्यिक कवी शंकर बडे यांच्या कविता व मालतीताई निमखेडकर यांच्या कथालेखनाचे विवेचन करण्यात आले. यावेळी वामनराव तेलंग यांनी वऱ्हाडी भाषेत लिहिणाऱ्यांची उणीव असल्याची खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आंदोलने होतात, लिखाण केले जाते. परंतु ते वरवरचे वाटते. वाचताना खोल तळाशी ते रुतत नाही. शंकर बडे यांनी आपल्या कवितांमधून शेतकऱ्यांचे दु:ख मांडले. मात्र ते महाराष्ट्रापर्यंत पोहचले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मालतीताई यांनी समाजाला बोध देणारे नीतीमानतेचे लेखन ताकदीने केले. लोकांना उद््बोधन करण्याची जाणीव त्यांच्या लेखनात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपले प्रकाशक बाल साहित्याकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी यावेळी नमूद केली. शंकर बडे यांच्या कवितांचे अवलोकन करताना ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांनी शंकर बडे यांच्या साहित्याला वऱ्हाडी मातीचा गंध असल्याचे सांगितले. त्यांच्या कवितांचा प्रवास विनोदापासून चिंतनापर्यंत झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा व कथा त्यांनी दमदारपणे मांडल्या. विनोदी ते गंभीर कविता हा त्यांचा प्रवास त्यांच्या अनुभवाशी प्रामाणिक आहे. त्यांच्या काव्यातून वऱ्हाडी बोलीची श्रीमंती दिसून येते. लोकांच्या व्यथा व कथा लोकभाषेत मांडणारा म्हणूनच सर्वांना आपलासा वाटणारा हा कवी होता, अशी भावना एदलाबादकर यांनी व्यक्त केली. ज्योती पुजारी यांनी मालतीताई निमखेडकर यांच्या ‘कर्मणी प्रयोग’ या कथेचे यावेळी कथन केले. हर्षवर्धन निमखेडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वृशाली देशपांडे यांनी केले. (प्रतिनिधी)