शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 13:44 IST

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

नागपूर : ‘इंधन क्षेत्रात मागील काही काळापासून मोठा बदल झाला आहे. आज इथेनॉलवर चालणारे जनरेटर आले असून, वाहने इथेनॉलवर चालवली जात आहेत. इलेक्ट्रिक बसेसदेखील बाजारात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे पंप बंद करून त्याजागी इथेनॉलचे व इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन निर्माण करायचे आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. संयोजक प्रा. योगानंद काळे यांच्या ‘स्वदेशी एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

भारतीय संस्कृती आणि इतिहास हा भारतीय विचारधारेशी संबंधित आहे. स्वदेशी विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. विदेशी तंत्रज्ञानाला विरोध न करता ते आपल्याकडे कसे विकसित होईल आणि त्याला स्वदेशी व स्वावलंबनाची जोड कशी देता येईल, यादृष्टीने विचार करावा. कृषी क्षेत्रात स्वदेशीचा प्रचार स्वदेशी जागरण मंचाने करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी डॉ. विनायक देशपांडे, शिरीष तारे, धनंजय भिडे, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीEconomyअर्थव्यवस्थाtechnologyतंत्रज्ञान