शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 13:44 IST

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

नागपूर : ‘इंधन क्षेत्रात मागील काही काळापासून मोठा बदल झाला आहे. आज इथेनॉलवर चालणारे जनरेटर आले असून, वाहने इथेनॉलवर चालवली जात आहेत. इलेक्ट्रिक बसेसदेखील बाजारात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे पंप बंद करून त्याजागी इथेनॉलचे व इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन निर्माण करायचे आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. संयोजक प्रा. योगानंद काळे यांच्या ‘स्वदेशी एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

भारतीय संस्कृती आणि इतिहास हा भारतीय विचारधारेशी संबंधित आहे. स्वदेशी विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. विदेशी तंत्रज्ञानाला विरोध न करता ते आपल्याकडे कसे विकसित होईल आणि त्याला स्वदेशी व स्वावलंबनाची जोड कशी देता येईल, यादृष्टीने विचार करावा. कृषी क्षेत्रात स्वदेशीचा प्रचार स्वदेशी जागरण मंचाने करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी डॉ. विनायक देशपांडे, शिरीष तारे, धनंजय भिडे, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीEconomyअर्थव्यवस्थाtechnologyतंत्रज्ञान