शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 13:44 IST

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

नागपूर : ‘इंधन क्षेत्रात मागील काही काळापासून मोठा बदल झाला आहे. आज इथेनॉलवर चालणारे जनरेटर आले असून, वाहने इथेनॉलवर चालवली जात आहेत. इलेक्ट्रिक बसेसदेखील बाजारात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे पंप बंद करून त्याजागी इथेनॉलचे व इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन निर्माण करायचे आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. संयोजक प्रा. योगानंद काळे यांच्या ‘स्वदेशी एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

भारतीय संस्कृती आणि इतिहास हा भारतीय विचारधारेशी संबंधित आहे. स्वदेशी विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. विदेशी तंत्रज्ञानाला विरोध न करता ते आपल्याकडे कसे विकसित होईल आणि त्याला स्वदेशी व स्वावलंबनाची जोड कशी देता येईल, यादृष्टीने विचार करावा. कृषी क्षेत्रात स्वदेशीचा प्रचार स्वदेशी जागरण मंचाने करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी डॉ. विनायक देशपांडे, शिरीष तारे, धनंजय भिडे, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीEconomyअर्थव्यवस्थाtechnologyतंत्रज्ञान