शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हुडकेश्वरच्या विकासाला हवी गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:30 IST

नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देमूलभूत सुविधांचा अभाव : समस्यांमुळे नागरिक त्रस्त; १२५ कोटींचा निधी दिल्यानंतरही कामे संथच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. परंतु मूलभूत समस्यांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पारडी, पुनापूर, वाठोडा आदी भागातही समस्यांचा डोंगर आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हुडकेश्वर-नरसाळा भागातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने १२५ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. यात पाण्याची पाईप लाईन व जलकुंभ, स्मशानभूमी, गडर लाईन पावसाळी नाल्या आदी कामांचा समावेश आहे. परंतु विकास कामांची गती संथ आहे. तसेच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.हुडके श्वर येथील मुख्य रस्ता सिमेंट क्राँक्रीटचा करण्यात आला. परंतु कामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी सिमेंट रोडच्या कामाची त्रयस्तामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चांगल्या दर्जाची कामे व्हावीत, यासाठी प्रभाग २९ मधील नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज होती.प्रभागातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. परंतु सहा महिन्यांत महापालिका सभागृहात एकदाही या भागातील समस्या मांडलेल्या नाही. हुडकेश्वर- नरसाळा परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. परंतु कामाला गती नाही. पोरा नदीच्या पलीकडील भागातील अनेक वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. गडर लाईनची कामे सुरू आहे. परंतु कामाला गती नाही. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच पावसाळी नाल्यांचा अभाव आहे. असे असूनही निवडणुकीनंतर सुविधा नसलेल्या वस्त्यात नगरसेवकांचे दर्शन झाले नसल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.टँकरद्वारे पाणीपुरवठाशासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु पाईप लाईन टाकण्याचे काम संथ आहे. पोरा नदीच्या पलीकडील भागातील अनेक वस्त्यात पाईप लाईन टाकण्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी विकासाची ग्वाही दिली होती. परंतु आता त्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.डासांमुळे नागरिक त्रस्तप्रभाग २९ मध्य मोठ्या प्रमाणात रिकामे प्लाट आहेत. पावसाळ्यात या प्लाटमध्ये पाणी साचले होते. अजूनही काही ठिकाणी डबक ी साचली आहेत. त्यातच कचरा साचला असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने डास नियंत्रणासाठी तातडीने उपायोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.उद्यानांचा अभावहुडकेश्वर-नरसाळा भागातील लोकसंग्या ५० हजाराहून अधिक आहे. परंतु या परिसरात एकही उद्यान नाही. निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा, रस्ते, स्मशान भूमीचे बांधकाम, गडर लाईन, पावसाळी नाल्या, पथदिवे, शाळा, उद्यान अशा स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची ग्वाही दिली होती. परंतु निवडून आल्यानंतर नगरसेवकांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे.नदीला संरक्षण भिंत नाहीहुडकेश्वर-नरसाळा भागातून पोरा नदी वाहते. नदीलगत नागरिकांनी घरे उभारलेली आहेत. परंतु नदीला संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात पुराचे पाणी वस्त्यांत शिरण्याचा धोका असतो. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता महापालिकेने संरक्षण भिंत उभारावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सभागृहात सभापती गप्पचहुडकेश्वर - नरसाळा भागातील विकास कामांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध केला आहे. परंतु विकास कामे करण्याची महापालिकेचीही जबाबदारी आहे. या संदर्भात प्रभागातील नगरसेवक व झोनचे सभापती भगवान मेंढे यांनी सभागृहात प्रश्न मांडणे अपेक्षित होते. मात्र गेल्या सहा महिन्यात मेंढे सभागृहात एकदाही बोललेले नाही.