शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशामध्ये ‘स्मार्ट’ गावांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:31 IST

देशातील बहुतांश जनता गावात राहते. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी शहरांना ‘स्मार्ट’ करण्यासोबतच गावांचादेखील विकास झाला पाहिजे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील बहुतांश जनता गावात राहते. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी शहरांना ‘स्मार्ट’ करण्यासोबतच गावांचादेखील विकास झाला पाहिजे. ‘स्मार्ट’ गावांची आवश्यकता असून यामुळे गावातून होणारे स्थलांतरण थांबू शकते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सोमवारी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनाचा समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते.रेशीमबाग मैदानात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, हरयाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनकड, मध्य प्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन, खा.अजय संचेती, खा.रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील शेतकºयांमध्ये आत्मविश्वास जागविणे आवश्यक आहे. शेतकºयांना प्रगतीसाठी पीक घेण्याची पद्धती बदलणे गरजेचे आहे. शिवाय मालाला जिथे मागणी आहे, अशी बाजारपेठदेखील शोधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.चीनमध्ये बांबू लागवड व त्याआधारित उद्योगांमुळे ५० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. विदर्भातील शेतकरी शेतीच्या धुºयावर बांबूचे उत्पादन करू शकतात. बांबूवरील ‘टीपी’ (ट्रांजिट पास) काढण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून यामुळे बाबूंची लागवड व वाहतूक करणे सुलभ झाले आहे. बांबूला भाव न मिळाल्यास त्याला उसाप्रमाणे भाव देण्याची शासनाची तयारी आहे. केंद्र शासनाने झुडपी जंगले व चराईच्या जागा यांना वनजमिनी ऐवजी राजस्व जमिनी म्हणून मान्यता दिल्यामुळे लाखो हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊन लाखो लोकांना रोजगार निर्माण होईल, असे प्रतिपादन यावेळी गडकरी यांनी केले. यावेळी मंचावर आ.नाना शामकुळे, सुलेखा कुंभारे, पाशा पटेल,डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले.चंद्रपुरात लवकरच ‘युरिया’ प्रकल्पहंसराज अहिर यांनी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’सारखे उपक्रम शेतकºयांसाठी लाभदायक व दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. चंद्रपूरमध्ये ‘युरियाचा प्रकल्प’ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून लवकरच त्याचे भूमिपूजन होईल, असे त्यांनी सांगितले.गावांमध्ये यंत्रसामग्रींची बँक हवीशेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून त्यांची किंमत लक्षात घेता एका शेतकºयाला ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे गावातील शेतजमिनीपर्यंत जर तंत्रज्ञान पोहोचवायचे असेल तर गावागावांमध्ये यंत्रसामग्रींची ‘बँक’ बनविण्याची आवश्यकता आहे. यासाठी खासदार, आमदार व जनप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी, सरकारी योजना इत्यादींच्या माध्यमातून निधी उभारून हे तंत्रज्ञान गरजूंना आवश्यक ते शुल्क घेऊन उपलब्ध करुन दिले पाहिजे, असा सल्ला गडकरींनी यावेळी दिला.गंगानदीच्या काठावर १० कोटी वृक्ष लावणारवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात चार कोटी वृक्षारोपण करून एक नवा पुढाकार घेतला. गंगानदीच्या काठावरदेखील वृक्षारोपण करण्याचा केंद्राचा विचार आहे. हरिद्वार ते कोलकाता यादरम्यान गंगानदीच्या काठावर १० कोटी वृक्ष लावण्यात येतील. यासाठी सुधीर मुनगंट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.